Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजकीय ताकद वाढणार, शिवसेनेच्या खासदारांची संख्या ७ वरून १३ वर पोहोचणार

मुंबई: लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची (Shiv Sena) लोकसभेतील ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचे ९ खासदार (Member of Parliament) निवडून आले होते. त्यापैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या गटाला लोकसभाध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे लोकसभेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे.


उबाठातून स्वतंत्र झालेला गट लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत विलीन होणार असल्याचे वृत्त आहे. तसे झाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची लोकसभेतील ताकद वाढणार आहे. सध्या शिवसेनेचे लोकसभेत सात खासदार आहेत. उबाठातून बाहेर पडलेला गट विलीन झाल्यास शिवसेनेची खासदार संख्या १३ वर पोहोचणार आहे.


स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाकडे लोकसभेत केवळ ३ खासदार उरले आहेत. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे सध्या त्या गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत.


दरम्यान, हे ६ खासदार भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाल्यास पक्षाची लोकसभेतील संख्या ७ वरून थेट १३ पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील राजकारणात शिंदे गटाची भूमिका अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



सध्या शिवसेनेकडे डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde), नरेश म्हस्के (Naresh Mhaske), रवींद्र वायकर (Ravindra Waikar), प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav), श्रीरंग बारणे (Shrirang Barne), धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) हे ७ खासदार आहेत. त्यामध्ये आणखी ६ खासदारांची भर पडल्यास पक्षाला लोकसभेत अधिक प्रभावी उपस्थिती निर्माण करता येईल.


लोकसभेतील या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra political) वातावरण पुन्हा एकदा तापले असून पुढील काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. विशेषतः शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय समीकरणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०