मुंबई : भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryvanshi) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामन्यानंतर मैदानावर झालेल्या वादामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या प्रकरणावर बीसीसीआयने भूमिका स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. सामन्यानंतर श्रीलंकेच्या काही खेळाडूंशी झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूप धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले होते. सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर हा प्रकार घडला. मात्र, पंच आणि इतर खेळाडूंनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.(Telagana T20 League)
Navi Delhi: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि त्यातून मिळणाऱ्या ...
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणावर भाष्य करत सांगितले की, ही स्पर्धा श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अखत्यारित येते. त्यामुळे या घटनेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बीसीसीआय किंवा आयसीसीकडे नसून, तो मॅच रेफरी आणि पंचांकडे आहे.सैकिया म्हणाले,मैदानावर घडलेल्या घटना या खेळाचा एक भाग असतात. या प्रकरणात बीसीसीआयची कोणतीही भूमिका नाही.
विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका ...
वैभवसाठी बीसीसीआयचा विशेष निर्णय
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची आयर्लंड आणि इंग्लंड (England) दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघात निवड झाली आहे. त्याचे वय लक्षात घेता बीसीसीआयने (Bcci) विशेष निर्णय घेत त्याच्या आई-वडिलांनाही दौऱ्यावर सोबत पाठवण्याचे ठरवले आहे. सैकिया यांनी सांगितले की, वैभव संघातील इतर खेळाडूंपेक्षा खूप लहान आहे. त्याला मानसिकदृष्ट्या कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्याच्या पालकांनाही सोबत पाठवले जाईल. त्यांचा संपूर्ण खर्च बीसीसीआय उचलणार आहे.
संजय राऊत, सुनील राऊतला मोठा धक्का जात प्रमाणपत्र समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने महापालिका सदस्यत्व केले रद्द भाजपच्या सारीका पवार यांचा ...
तिरंगा मालिकेत फ्लॉप !
वैभव सूर्यवंशीची बॅट तिरंगी मालिकेत अद्याप अपेक्षेप्रमाणे तळपलेली नाही.त्याने चार वनडे सामन्यांत ११७ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १५३.९४ इतका आहे. आता अंतिम सामन्यात त्याच्याकडे मोठी खेळी करून टीकाकारांना उत्तर देण्याची सुवर्णसंधी असेल. वैभवकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, अंतिम सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.