Weather Alert: मान्सूनची प्रतीक्षा कायम! पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

मुंबई : जून (June) महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता आणि दमट हवामानाचा त्रास वाढला असून नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत. हवामान विभागाने राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.



कोकण विभाग


कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान कायम आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असली तरी तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने उकाड्याचा त्रास वाढला आहे.



पश्चिम महाराष्ट्र


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्येही तुरळक पावसाचा अंदाज आहे. मात्र सोलापूरसह काही भागांत तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.


मराठवाडा 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असली तरी उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.



उत्तर महाराष्ट्र 


उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून उष्णतेचा चटका अधिक तीव्र झाला आहे.



हवामान विभागाचा इशारा


हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तास राज्यात उष्णता आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून सक्रिय होऊन हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार