चाळीसगाव : स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली आहे. तसेच स्वतंत्र कारवाईत आणखी एक संशयित इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडून विनानंबरची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
मुंबई: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅकेटचा ...
नेमकं प्रकरण काय ?
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात (Chalisgaon City Police Station) दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने HF डिलक्स मोटारसायकल चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
पुढील तपासात भिसे याने चोरीची दुचाकी प्रशांत दीपक राजपूत (रा. हरिगिरी बाबा नगर, पाचोरा रोड) याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
नाशिक : भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केली असून पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात खंड ...
दरम्यान, गुन्हेगार शोध मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक इसम विनानंबर मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न दिल्याने प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्याला चाळीसगाव शहर पोलिसांच्या (Chalisgaon City Police) ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कवकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शेखर डोंभळे तसेच लक्ष्मण पाटील, राहुल पाटील आणि भूषण पाटील यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.






