मी दिल्लीला गेलो नाही - ओमराजे निंबाळकर

२० जूननंतर माध्यमांशी सविस्तर संवाद साधणार


मुंबई : उबाठा गटाला खिंडार पाडणाऱ्या 'ऑपरेशन टायगर'च्या केंद्रस्थानी असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर या संपूर्ण प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "मी दिल्लीला गेलो नसून सध्या पुण्यातच आहे," असा दावा करत त्यांनी सर्व चर्चांना तूर्तास पूर्णविराम दिला आहे. तसेच, येत्या २० जूननंतर माध्यमांसमोर येऊन आपली अंतिम भूमिका सविस्तर मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


ओमराजे निंबाळकर हे उबाठाचे अत्यंत निष्ठावंत शिलेदार मानले जात होते. त्यामुळे 'ऑपरेशन टायगर'मध्ये त्यांचे नाव समोर येताच राज्यभरातून त्यांच्यावर तीव्र आक्षेप घेतले जात आहेत. सोशल मीडियावर ओमराजे यांना प्रचंड ट्रोल केले जात असून, त्यांचे 'मातोश्री'शी एकनिष्ठ राहण्याचे दावे करणारे जुने व्हिडीओ आणि भाषणांच्या क्लिप्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ओमराजे यांनी स्वतः आपण दिल्लीत नसून पुण्यातच असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, २० जूनच्या मुहूर्तावर ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.दरम्यान, दिल्लीत ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचे वृत्त येत असले, तरी या पत्राबाबत अद्यापही मोठा संभ्रम असल्याचे चित्र आहे. बंडखोर खासदारांचे स्वाक्षऱ्यांचे पत्र किंवा त्यांचा एकत्र फोटो अद्याप समोर आलेला नाही. याच तांत्रिक मुद्द्याचा आधार घेत उबाठा गटाने दावा केला आहे की, त्या ६ पैकी २ खासदारांनी बंडखोरांच्या पत्रावर स्वाक्षऱ्याच केलेल्या नाहीत. ते २ खासदार अजूनही अधिकृतपणे उबाठासोबतच आहेत. लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेले पत्र तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचा दावा उबाठा नेत्यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Bhandup Bus Accident : भरधाव बेस्ट बसचं भांडुपमध्ये नियंत्रण सुटलं; पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक

मुंबई : मुंबईतील भांडुप (Bhandup) परिसरात बेस्ट बसचा विचित्र अपघात (Accident) घडला. भांडुपमधील कोकण नगर (Kokan Nagar) येथील क्रिटिकल

IND vs ENG : भारताचा T20I इतिहासातील सर्वात मोठा पराभव! इंग्लंडची मालिकेत 2-0 आघाडी

नॉटिंगहॅम : गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला (Team India) इंग्लंडविरुद्धच्या (England)

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे विहार तलाव भरला; मुंबईतील पहिला तलाव ओव्हरफ्लो!

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अखेर मुंबईतील पहिला Vihar (विहार) Lake (तलाव) ओसंडून (Overflow) वाहू

The Financial Giants of Sports : फिफा, आयसीसी की बीसीसीआय? जाणून घ्या कमाईचा 'राजा' कोण?

फुटबॉलची फिफा (FIFA), क्रिकेटची जागतिक संस्था आयसीसी (ICC) किंवा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बीसीसीआय (BCCI)...

Karnataka News : पावसात ४० वर्षांचं चंदनाचं झाड कोसळलं; ८५ वर्षीय वृद्ध लखपती!

कर्नाटक : पावसाळ्यात (Monsoon) मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि तुफान वाऱ्यांमुळे (Strong Winds) झाडं कोसळल्याच्या घटना वारंवार घडतात. अशा