Nashik Crime : लग्नाआधीच झाली त्याची हत्या, आठ वर्षांच्या प्रेमकथेचा असा झाला शेवट

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी गावात एका २५ वर्षीय मुलाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव सचिन चौरे आहे. सचिन हा कन्हेरवाडी परिसरातील एका मुलीच्या प्रेमात होता. आठ वर्षांपासून ते प्रेमात होते आणि ते होते. लवकरच लग्न करणार दोघांच्या घरच्यांची या लग्नाला संपत्ती होती. मात्र अचानक मुलीच्या भावाने सचिन ची हत्या केली.



का केली हत्या ?
सचिन चौरेचे एका तरुणीसोबत गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु सुरुवातीला कुटुंबीयांचा या प्रेमाला विरोध होता. मात्र तरुणीने सचिन सोबतच लग्न करणार असे ठामपणे घरच्यांना सांगितले. कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर तिने घरात जेवणही बंद केले अखेर घरच्यांनी माघार घेतली आणि लग्नाला संमती दिली. मुलीचे वडील आणि मामा यांनी सचिनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांची बैठक घेण्यात आली आणि लग्नाला संमती देण्यात आली. मात्र हे लग्न तरुणीच्या दोन भावांना मान्य नव्हते त्यांनी सचिनला मारण्यासाठी षडयंत्र रचलं



माहिती नुसार : सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अचानक तरुणीचे दोन भाऊ कन्हेरवाडी परिसरात पोहचले. ते सचिनच्या घरी गेले आणि त्यांनी सचिन वर तीक्ष्ण हत्याराने वार केले.सचिन गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटने नंतर त्यांनी घटनस्थळावरून पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना पकडलं आणि चांगलाच चोप दिला. दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पुढील तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं