Nashik Crime : लग्नाआधीच झाली त्याची हत्या, आठ वर्षांच्या प्रेमकथेचा असा झाला शेवट

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी गावात एका २५ वर्षीय मुलाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव सचिन चौरे आहे. सचिन हा कन्हेरवाडी परिसरातील एका मुलीच्या प्रेमात होता. आठ वर्षांपासून ते प्रेमात होते आणि ते होते. लवकरच लग्न करणार दोघांच्या घरच्यांची या लग्नाला संपत्ती होती. मात्र अचानक मुलीच्या भावाने सचिन ची हत्या केली.



का केली हत्या ?
सचिन चौरेचे एका तरुणीसोबत गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु सुरुवातीला कुटुंबीयांचा या प्रेमाला विरोध होता. मात्र तरुणीने सचिन सोबतच लग्न करणार असे ठामपणे घरच्यांना सांगितले. कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर तिने घरात जेवणही बंद केले अखेर घरच्यांनी माघार घेतली आणि लग्नाला संमती दिली. मुलीचे वडील आणि मामा यांनी सचिनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांची बैठक घेण्यात आली आणि लग्नाला संमती देण्यात आली. मात्र हे लग्न तरुणीच्या दोन भावांना मान्य नव्हते त्यांनी सचिनला मारण्यासाठी षडयंत्र रचलं



माहिती नुसार : सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अचानक तरुणीचे दोन भाऊ कन्हेरवाडी परिसरात पोहचले. ते सचिनच्या घरी गेले आणि त्यांनी सचिन वर तीक्ष्ण हत्याराने वार केले.सचिन गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटने नंतर त्यांनी घटनस्थळावरून पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना पकडलं आणि चांगलाच चोप दिला. दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पुढील तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar Crime : उल्हासनगर हादरले! आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या गोळ्याला संपवले; आईकडून २० वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या

Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या

Nashik Kumbhmela : गर्दी व्यवस्थापनासाठी मास्टर प्लॅन; मार्चपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न; शेखर सिंहांची माहिती

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ,

Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर

४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात