Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर

सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व गृहमंत्र्यांचे आभार


मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने मंगळवारी ७३३.२८ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला. वाढते सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) आव्हान आणि सागरी सुरक्षेचा वाढता विस्तार लक्षात घेता, महाराष्ट्र पोलीस दलाला अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले.



या महत्त्वाकांक्षी योजनेच्या एकूण ७३३.२८ कोटी रुपयांच्या खर्चात ६० टक्के हिस्सा केंद्र सरकार उचलणार असून, उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात गुन्ह्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. हे लक्षात घेऊन या निधीचा मोठा हिस्सा पोलीस दलात 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी केला जाईल. याशिवाय, मुंबईसह महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सागरी सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जाईल, तसेच तरुण पिढीला विळखा घालणाऱ्या अंमली पदार्थांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ड्रग्जविरोधी मोहीम अधिक बळकट केली जाणार आहे. त्याशिवाय आधुनिक शस्त्रे आणि अत्याधुनिक वाहने या निधीतून खरेदी केली जातील.

Comments
Add Comment

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे