Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर

सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व गृहमंत्र्यांचे आभार


मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने मंगळवारी ७३३.२८ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला. वाढते सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) आव्हान आणि सागरी सुरक्षेचा वाढता विस्तार लक्षात घेता, महाराष्ट्र पोलीस दलाला अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले.



या महत्त्वाकांक्षी योजनेच्या एकूण ७३३.२८ कोटी रुपयांच्या खर्चात ६० टक्के हिस्सा केंद्र सरकार उचलणार असून, उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात गुन्ह्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. हे लक्षात घेऊन या निधीचा मोठा हिस्सा पोलीस दलात 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी केला जाईल. याशिवाय, मुंबईसह महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सागरी सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जाईल, तसेच तरुण पिढीला विळखा घालणाऱ्या अंमली पदार्थांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ड्रग्जविरोधी मोहीम अधिक बळकट केली जाणार आहे. त्याशिवाय आधुनिक शस्त्रे आणि अत्याधुनिक वाहने या निधीतून खरेदी केली जातील.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान