Chandrashekhar Bawankule : राज्यातील नद्या आणि नाल्यांच्या खोलीकरणासाठी नवीन योजना आणणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्याबाबत निर्णय


मुंबई : राज्यातील नद्या व नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी शासन स्वतंत्र नवीन योजना आणणार असून, नागपूर, अमरावती जिल्ह्यांतील खोलीकरणाच्या कामांसाठी तातडीने मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या कामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



या बैठकीला जलसंधारण मंत्री संजय राठोड, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे तसेच महसूल व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर व अमरावती विभागातील अनेक नद्या आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होत असून जलसाठा क्षमता कमी होते. परिणामी भूजल पातळी, सिंचन व्यवस्था आणि पावसाळ्यातील पूरनियंत्रणावर विपरीत परिणाम होत असल्याच्या बाबींवर बैठकीत चर्चा झाली. यावर खोलीकरणाची कामे अधिक परिणामकारक आणि कालबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.



बैठकीत विविध विभागांच्या मंजुरी प्रक्रियेमुळे कामांना होणारा विलंब, गाळ उपशावरील नियम आणि स्थानिक स्तरावरील अडचणी यांचाही आढावा घेण्यात आला. यावर उपाय म्हणून आवश्यक प्रशासकीय अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

नद्या व नाल्यांचे खोलीकरण ही काळाची गरज आहे. जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पूरनियंत्रणाच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांतील कामांना गती देण्यासाठी स्पष्ट एसओपी तयार करण्यात येईल. तसेच नाला खोलीकरणाच्या कामांसाठी राज्य शासन लवकरच स्वतंत्र नवीन योजना आणणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक अधिकार दिल्यास ही कामे अधिक प्रभावीपणे आणि वेगाने पूर्ण करता येतील.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली