Ramdas Athawale : तृणमूलच्या उर्वरित खासदार आणि आमदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे!

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राजकीय भविष्याचा विचार करून आंबेडकरी विचार निवडावा

मुंबई : "तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी बंडखोरी करून त्रिपुरातील 'नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया'मध्ये प्रवेश केला आहे. या खासदारांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना असती, तर त्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले असते. मात्र, आता तृणमूलच्या उर्वरित खासदार आणि बंडखोर आमदारांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष असलेल्या आरपीआयमध्ये सामील व्हावे", असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी केले.



पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील दबावामुळे आतापर्यंत पक्षातील खासदार बंड करण्यास धजावत नव्हते. मात्र, आता सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला कंटाळलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांचे नेतृत्व नाकारले आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले, "तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व झुगारून त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला आहे. तृणमूलचे खासदार बंड करणार आहेत, हे जर मला आधी कळले असते, तर ते सर्व खासदार माझ्या ओळखीचे असल्याने मी त्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले असते." २० खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता उर्वरित तृणमूलच्या खासदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे, असे आवाहन त्यांनी केले.



६० बंडखोर आमदारांनाही निमंत्रण

खासदारांपाठोपाठ पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या ६० आमदारांनीही ममता बॅनर्जींचे नेतृत्व झुगारून बंड केले असून त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या आमदारांचा उल्लेख करत आठवले म्हणाले की, तृणमूल काँग्रेसविरुद्ध बंडखोरी केलेल्या आमदारांनीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवून रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा.
Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात