राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) विविध शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी खुशखबर आहे. 'एमएमआर' क्षेत्रातील सर्व सार्वजनिक बस सेवांमध्ये सुसूत्रता आणून प्रवाशांना एकाच तिकिटावर संपूर्ण प्रवास करता यावा, यासाठी नगर विकास विभागाने सोमवारी उच्चस्तरीय ‘अभ्यास गट’ स्थापन केला आहे. हा अभ्यास गट प्रामुख्याने बस मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, वेळापत्रकांचा मेळ घालणे आणि प्रवाशांना वाजवी दरात प्रवास देणाऱ्या ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर काम करणार आहे. यामुळे भविष्यात मुंबई आणि आसपासच्या उपनगरांतील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि किफायतशीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नीति आयोगाने देशभरातील प्रमुख शहर-क्षेत्रांना आर्थिक वाढीसाठी ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशात ‘पायलट सिटी-रिजन’ म्हणून ‘मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रा’ची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील ‘ग्रोथ हब नियामक मंडळा’ने दिलेल्या निर्देशानुसार, या संपूर्ण क्षेत्रासाठी एकात्मिक बस वाहतूक आराखडा तयार करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांना अवाढव्य वाढीव वीजबिले तसेच ...
मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांना अवाढव्य वाढीव वीजबिले तसेच ...
मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांना अवाढव्य वाढीव वीजबिले तसेच ...





