Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावली; 12 जिल्ह्यांना उष्णतेचा तर 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट













मुंबई: महाराष्ट्रातील (Maharashtra) हवामानात पुन्हा मोठा बदल होत असून मान्सूनची प्रगती मंदावल्याने अनेक भागांत उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास वाढला आहे. अशात हवामान विभागाने 15 जूनसाठी राज्यातील 12 जिल्ह्यांना उष्णतेचा आणि 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

कोकणात उष्णता वाढणार




कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिर जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात उष्णता आणि हलक्या पावसाची शक्यता


नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात दुहेरी परिस्थिती


कोल्हापूर आणि सातारा येथे उष्णतेचा यलो अलर्ट आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असून ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.


मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव कायम


छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर परभणी, बीड, हिंगोली,नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पावसाचा इशारा

अमरावती जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे मेघगर्जनेसह वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

नागरिक आणि शेतकऱ्यांना आवाहन

राज्यातील बहुतांश भागांत उष्णता, दमट वातावरण आणि अधूनमधून वादळी पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








Comments
Add Comment

Pune Mumbai Expressway : मुसळधार पावसाचा मोठा फटका; पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि जुना महामार्ग दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद

मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Devendra Fadnavis : देशी गायीकडे ज्या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांचे नुकसान झाले, मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

नागपूर (Nagpur) : भारत देश हा कृषी संस्कृतीचा होता. देश संपन्न होता. दूध,दही भरपूर प्रमाणात होते. हे समृद्धीचे प्रतीक

Mayor Ritu Tawde : कुर्ल्यातील वृक्ष दुर्घटनेनंतर महापौर ॲक्शन मोडमध्ये! मृताच्या कुटुंबाला ₹५ लाखांची मदत; मुंबईत तातडीच्या ट्री ऑडिटचे आदेश

मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा परिसरात झाडाची फांदी कोसळून ६३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी

एकाच कुटुंबातील पाच जण गायब ! पळाले की घातपात ? नेमकं घडलं काय ?

Nagpur : नागपूरच्या धानतोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्य २४ जूनपासून

Chhatrapati Sambhajinagar DCC Bank : औरंगाबाद जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा; २० पैकी १८ जागांवर वर्चस्व, भूमिपुत्र बचाव पॅनलचा पराभव

छत्रपती संभाजीनगर : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central