मुंबई आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आर्थिक व प्रशासकीय तणावाखाली आहे. दोन्ही संस्थांमध्ये निधीअभाव, तोटा, वेतन व निवृत्ती लाभांचे प्रश्न आणि कर्मचारी असंतोष यामुळे अडचणी वाढल्या. यामुळे प्रवासी सेवांच्या सातत्यावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या एका निर्णायक टप्प्यावर उभी आहे. एका बाजूला बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, तर दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या भूमिकेबाबत तीव्र असंतोष वाढताना दिसत आहे. या दोन्ही सेवांतील कर्मचारी आणि कामगार संघटना आता अधिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. हा संघर्ष अधिक तीव्र झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम विशेषतः पावसाळ्याच्या काळात मुंबईकर तसेच महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना भोगावे लागू शकतात. अलीकडेच बेस्ट उपक्रमाला देण्यात येणाऱ्या एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने रोखून धरला. समितीने आतापर्यंत देण्यात आलेल्या सुमारे १२,३०० कोटी रुपयांच्या अनुदानाचा सविस्तर हिशेब सादर करण्याची मागणी केली आहे.
Nashik News : गेल्या काही महिन्यांत नाशिकमध्ये अनेक रिक्षाचालक अरेरावी करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण याच रिक्षाचालकांच्या अरेरावीची ...
Nashik News : गेल्या काही महिन्यांत नाशिकमध्ये अनेक रिक्षाचालक अरेरावी करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण याच रिक्षाचालकांच्या अरेरावीची ...
Nashik News : गेल्या काही महिन्यांत नाशिकमध्ये अनेक रिक्षाचालक अरेरावी करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण याच रिक्षाचालकांच्या अरेरावीची ...