Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली. घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या गाडीतून रुळांवर उड्या मारल्या. त्याचवेळी समोरच्या रुळांवरून वेगाने आलेल्या गाडीने प्रवाशांना धडक दिली. यामुळे चार जणांचा रुळांवरच मृत्यू झाला.



अपघात प्रकरणी एका प्रवाशाने माहिती दिली. इंटरसिटीमध्ये आग लागल्याची बातमी पसरली. याच सुमारास गाडीचा वेग कमी झाला आणि गाडी रुळांवर थांबली. गाडी थांबण्याचे नेमके कारण माहिती नाही. पण आग लागल्याचे ज्यांनी ऐकले त्यापैकीच काही प्रवासी धावत्या गाडीतून उड्या मारून रुळांवर उतरले. नेमकी त्याचवेळी समोरच्या रुळांवरून वेगाने एक गाडी आली. इंटरसिटीमधून उड्या मारलेल्यांपैकी सर्वांना रुळ ओलांडून बाजूला होण्याची संधी मिळाली नाही. वेगाने आलेल्या गाडीने प्रवाशांना धडक दिली. यामुळे चार जणांचा रुळांवरच मृत्यू झाला; असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.



एक महिला प्रवासी आणि तिचे मूल यांचा रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाला त्यावेळी त्या महिलेचा पती दुसऱ्या मुलाला घेऊन गाडीतून उतरण्याची तयारी करत होता. पती आणि दुसरे मूल उतरले नसल्यामुळे सुरक्षित राहिले.या प्रकरणी चौकशी होणार आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय