Raigad Accident : जेएनपीटी परिसरात भीषण स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

रायगड : जेएनपीटी परिसरातील जेएसडब्ल्यू ऑइल जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेलवाहिनी पिगिंगचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या दुर्घटनेत करावली (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र शिंदे आणि उरण तालुक्यातील पिरकोन येथील गजानन गावंड यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सुमारे ९ वाजता जेट्टी परिसरात काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.


घटनेनंतर दोन्ही मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व प्राथमिक तपास सुरू केला आहे. तसेच जेएनपीटी प्रशासनाकडूनही स्वतंत्र चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, पिगिंगसारख्या धोकादायक कामादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन झाले का, याबाबत कामगार संघटना आणि स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हेल्मेट, गॅस टेस्टिंग आणि ‘परमिट टू वर्क’ प्रक्रियेचे पालन झाले नसल्याचा आरोपही काही संघटनांकडून करण्यात येत आहे.या घटनेनंतर जेट्टीवरील कामकाज तात्पुरते थांबविण्यात आले असून, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक