BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल


मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून सांगत असले की नाले सफाई शंभर टक्के झाली आहे. मात्र, मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश नाल्यातील गाळ अद्याप काढलाच नसल्याचे विविध भागांमधील गाळ आणि कचऱ्याने भरलेली छायाचित्रेच प्रदर्शित करत यंदा मुंबईची तुंबई होणारच असल्याचा दावा केला आहे. नालेसफाई शंभर टक्के तर गाळ आाणि कचऱ्याने नाले तुडुंब भरलेले कसे असाही सवाल करतच त्यांनी पावसाला विलंब झाल्याने याची मोठी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन नाले सफाई त्वरित करावी, असे आवाहन केले आहे.



पावसाळा तोंडावर आला तरी नाले सफाई झाली असल्याचा दावा फोल ठरविणारे छायाचित्रे दाखवत मनसेचे महापालिका गटनेते, नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी शनिवारी जाहीर पत्रकार परिषदेत प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली.मुंबईतील वडाळा, धारावी तसेच उपनगरातील भारत नगर, नाहूर गोवंडी, कुर्ला, पंचशील नगर अशोक नगर, क्रांती नगर - कुर्ला वाकोला, मानखुर्द, चेंबूर, मोगरा नाला, केशव पाडा नाला आदीं नाले गाळाने तसेच कचऱ्याने भरले असल्याचे फोटो बॅनरच्या माध्यमातून किल्लेदार यांनी दाखविले.


ज्यादिवशी सत्ताधारी नाले पाहणीकरिता जातात, त्या आधी महापालिकेचे अधिकारी ठेकेदारांना सूचित करतात. मग ते सर्व मशीनरी लावून तात्पुरता गाळ काढत असल्याचे दाखवतात. आम्ही सातत्याने पालिकेत या प्रश्नावर आवाज उठवायला जातो. पण मात्र आम्हांला बोलू दिले जात नाही, असे त्यांनी सांगितले.भाजपचेच सहकारी महापौरांची दिशाभूल करत आहेत. असे सांगत पावसाला विलंब झाला ही मोठी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन नाले सफाई त्वरित करावी असे आवाहन केले.



सध्या पाणी टंचाई जाणवत असल्याने पालिकेकडून १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. कपात करणे हे ठीक आहे. मात्र पाण्याचा प्रेशर कमी का केला जातो? त्यामुळे इतर नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित नसल्याबाबतची नाराजी त्यांनी केली. मुंबईत जवळपास ७० टक्के रस्ते काँक्रिटीकरण झाले असतांनाही, सभागृहात खड्डे भरण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. जर रस्ते झाले, तर मग खड्डे भरण्याचा प्रस्ताव कशासाठी असा सवालही किल्लेदार यांनी यावेळी उपस्थित केला.

Comments
Add Comment

Mumbai Rain : धक्कादायक! भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब

पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता Mumbai : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, शहराच्या काही

मागील सहा तासात पावसाने मुंबईला झोडपले... अनेक परिसर जलमय, वाहतुकीसाठी मार्ग केले बंद

मुंबई  : मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ ते

Mumbai Hit And Run : मुंबईच्या जोगेश्वरीत भीषण अपघात; भरधाव टँकरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम परिसरात मध्यरात्री भीषण 'हिट अँड रन'ची (Hit And Run) घटना घडली. अमृत नगर येथील

Mumbai Tree Collapse Incidents : मुंबईतील झाडांच्या फांद्यांची छाटणी, तर पडझड होते कशी?

मुंबई : मुंबईत चेंबूर (Chembur) येथील झाडांच्या दुघर्टनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असून आतापर्यंत एक लाखांहून

Mumbai Red Alert : मुंबईला दोन दिवसांचा रेड अलर्ट! ७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात पावसाचा (Rain) जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रादेशिक हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) मुंबई, ठाणे,

महापौरांच्या दालनात शिरुन विरोधी पक्षनेत्यांची कर्मचाऱ्यांना दमदाटी

महापौरांनी केला घुसखोरीचा आरोप, पोलिसांत नोंदवणार तक्रार मुंबई  (Mumbai): मुंबई महापौर रितू तावडे या कार्यालयात