Nashik : धर्माच्या नावावर राजकारण खपवून घेणार नाही, ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनात अडवणुकीवर साध्वी त्रिकाल भवंता संतप्त

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीदरम्यान महिला आखाड्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप परी महिला आखाड्यांच्या प्रमुख साध्वी त्रिकाल भवंता यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्यात सहभागी होण्यापासून पोलिसांकडून अडवण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.



मुंबई नाका परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना साध्वी त्रिकाल भवंता म्हणाल्या की, या प्रकरणी पोलिसांनी कोणाच्या आदेशावरून आपल्याला अडविले, याचे स्पष्टीकरण द्यावे तसेच संबंधितांवर कारवाई करावी. त्या पुढे म्हणाल्या, ध्वजपूजन हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून धर्मासाठी आयुष्य समर्पित केलेल्या संत-महंतांसाठी अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे त्या बराच वेळ आवारात थांबल्या. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.




महिला संतांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात


कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी झालेल्या महिला साध्वी संमेलनाच्या बैठकीत महिला आखाड्यांच्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, निवासासाठी तंबू, भोजन व्यवस्था तसेच धार्मिक कार्यक्रमांमधील सहभागाबाबत आश्वासन दिले होते. यापुर्वी महिला साध्वींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पूजाविधीत सहभागी होण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.महिला धर्माचार्यांच्या निवास, सुरक्षा आणि धार्मिक अधिकारांबाबत कोणती अधिकृत व्यवस्था करण्यात आली आहे, याची लेखी माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. धार्मिक कार्यात अडथळे निर्माण करणे हा महिला संतांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात असल्याचा आरोप त्यांनी केला.




 धर्माच्या नावावर राजकारण खपवून घेणार नाही


धर्माच्या नावावर राजकारण केले जात असेल, तर ते स्वीकारले जाणार नाही. मला कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखल्याने मानसिक आणि धार्मिक आघात झाला आहे. महिला धर्माचार्यांना का अडविण्यात आले, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे,” असे त्रिकाल भवंत यांनी स्पष्ट केले.या प्रकरणी कुंभमेळा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणी कुंभमेळा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ उमेश वालझाडे उपस्थित होते.

Comments
Add Comment

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या