Water Shortage : भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात पाणीपुरवठ्याचे नियोजन करा, अशी मागणी

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांची मागणी


मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात यंदाच्या मान्सून हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.


महापौर रितू तावडे यांना पाठविलेल्या पत्रात शिंदे यांनी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजाचा उल्लेख करत, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, अद्याप समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झालेली नसल्याने धरणांमधील पाणीसाठाही दिवसेंदिवस कमी होत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.



या पार्श्वभूमीवर आगामी काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने पाणी वाटप व वापराचे प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भातील उपाययोजना तातडीने राबवून पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता जलस्रोतांचे संवर्धन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती प्रभाकर शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे.



पावसाळ्यातील वाहतूक समस्यांवर तातडीने उपाययोजना


पावसाळ्यात मुंबईत उद्भवणाऱ्या वाहतूक समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.मुंबईकरांना पावसाळ्यात वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणींचा सामना कमी करावा लागावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अनेक ठिकाणी कोंडी निर्माण होते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची पूर्वतयारी करून योग्य त्या उपाययोजना तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : लैंगिक जाहिरातींवर बंधने येणार

कायद्यात सुधारणा करण्याचे मंत्री आशिष शेलार यांचे विधानसभेत आश्वासन; तज्ज्ञ समिती स्थापन करणार मुंबई (Mumbai):

Devendra Fadnavis : जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १ हजार २०० कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेससोबत करार मुंबई : हिंदुस्तान कोका-कोला(Cococola)

Chandrashekhar Bawankule : जिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकारांमध्ये मोठे बदल

बारा वर्षांनंतर नवी नियमावली; महसूलमंत्री बावनकुळेंचा ॲक्शन प्लॅन मुंबई(Mumbai) : राज्यातील महसूल प्रशासनाला अधिक

Nitesh Rane : सिंधुदुर्गमध्ये उभारणार भव्य शिवसृष्टी

मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा; आमदार निलेश राणे यांची बैठकीला उपस्थिती मुंबई : सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे

Dada Bhuse : 'मातृभाषा आधारित प्रशिक्षणासाठी शासन कटिबद्ध'; विधान परिषदेत दादा भुसे यांची माहिती

मुंबई : राज्यातील शिक्षकांना मातृभाषा आधारित आणि बहुभाषिक अध्यापनशास्त्राचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी

Uday Samant : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करणार

- मंत्री उदय सामंत यांची घोषणा; सर्व परवानग्या पूर्ण, मुंबईकरांची पाणीचिंता मिटणार मुंबई : मुंबईची वाढती