Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर











रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. खरवली आदिवासी वाडी येथे एका आईने आपल्या चार लहान मुलांना विषारी थंडपेय पाजल्यानंतर स्वतःही विषप्राशन (Poison) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी प्रकारात आईसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला असून दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Suicide News)



मिळालेल्या माहितीनुसार, आशा जाधव (वय 29) यांनी बाजारातून आणलेल्या थंडपेयामध्ये विषारी औषध मिसळले. त्यानंतर त्यांनी आपल्या चार मुलांना ते थंडपेय पाजले आणि स्वतःही ते प्राशन केले. काही वेळातच सर्वांची प्रकृती बिघडू लागली. उलट्या आणि अस्वस्थता वाढल्यानंतर शेजाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.


मात्र उपचारादरम्यान आशा जाधव यांच्यासह त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आशा जाधव, नंदिनी जाधव (वय 7) आणि दुर्वा जाधव (वय 6) यांचा समावेश आहे.


या घटनेत इतर दोन मुलांचे प्राण वाचले असले तरी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



या टोकाच्या निर्णयामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा इतर कोणते कारण यामागे होते का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली असून कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून माहिती घेतली जात आहे.


या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू आणि दोन मुलांचे मृत्यूशी सुरू असलेले युद्ध यामुळे नागरिकांमध्ये दुःख आणि संतापाचे वातावरण आहे.





Comments
Add Comment

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराला सुवर्णवैभव! अधिक मासात भाविकाकडून १.५ किलो सोन्याचा कळस दान

कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला (Kolhapur Ambabai Temple) नव्या सुवर्णवैभवाची भर पडली आहे.