Maharashtra Weather News : जूनअखेरीस पावसाचा जोर वाढणार, त्यानंतर मान्सूनची गती कमी होणार

मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरातील नागरिक मान्सूनच्या (Monsoon) जोरदार आगमनाची वाट पाहत आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनचा वेग मंदावला असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, ईशान्य भारतात (Northeast India) मान्सूनच्या हालचालींना वेग आला आहे. आसाम (Assam), मेघालय (Meghalaya), नागालँड (Nagaland) आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) या राज्यांमध्ये मान्सून पुढे सरकल्याचे दिसून येत आहे.


भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) दिलेल्या अंदाजानुसार, १८ जून ते २५ जून या कालावधीत मुंबई (Mumbai) आणि कोकण किनारपट्टी (Konkan Coast) परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस (Moderate Rainfall) पडण्याची शक्यता आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २५ जून ते २ जुलै या कालावधीत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Above Average Rain) नोंदवला जाऊ शकतो. मात्र, २ जुलै ते ९ जुलै दरम्यान पावसाचे प्रमाण कमी (Rainfall Deficit) राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



हवामान विभागाने (IMD) चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यासाठी वादळी पाऊस (Thunderstorm) आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहू शकतो. याशिवाय नाशिक (Nashik) आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


शनिवारी रायगड (Raigad), सिंधुदुर्ग (Sindhudurg), सांगली (Sangli), सोलापूर (Solapur), बीड (Beed), नांदेड (Nanded), लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv), भंडारा (Bhandara), गडचिरोली (Gadchiroli) आणि गोंदिया (Gondia) या जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.



दुसरीकडे, वाशिम (Washim) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट (Heatwave Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर अकोला (Akola) आणि अमरावती (Amravati) जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट (Heatwave Yellow Alert) देण्यात आला आहे. राज्यात पुढील काही दिवस हवामानात (Weather Update) मोठे बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Palghar Accident : शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

पालघर:  पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर एक भीषण अपघात (Accident) घडला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या

Pune Satara Highway Accident: पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक, चालक गंभीर जखमी

पुणे : पुणे-सातारा (Pune Satara Highway) महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात (Accident) घडून एका ट्रक चालकाला गंभीर दुखापत

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Farmers Development : राज्यातील १३ हजार कृषी कर्मचाऱ्यांना मिळणार अत्याधुनिक लॅपटॉप

कृषी प्रशासनाच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी १०९ कोटींचा निधी; 'सीओईपी'मार्फत होणार गुणवत्ता तपासणी मुंबई : कृषी

IRCTC : वाट कसली बघताय बॅगा भरा, आयआरसीटीसीकडून 'दिव्य दक्षिण यात्रा', भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (IRCTC), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या

Maharashtra Government : राज्यातील सर्व ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद

 राज्य सरकारचा निर्णय; कैद्यांची जिल्हा कारागृहात रवानगी होणार मुंबई : महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली असलेली