Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ वाहतूक व्यवस्थेला बळकटी; पेठ रोडवरील पायाभूत सुविधा उभारणी वेगात

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने घाट परिसराकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांवर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कालवा ते मेहेरधाम या सुमारे ४.७८५ किलोमीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्यावर विविध युटिलिटी कामांना गती देण्यात आली आहे.


हा मार्ग घाट परिसर, पार्किंग व्यवस्था आणि शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने भविष्यातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणासोबतच भूमिगत सेवा सुविधांचे जाळे सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.



सांडपाणी व्यवस्थापन, ऑप्टिकल फायबर नेटवर्क (ओएफसी) आणि पावसाळी पाणी निचरा व्यवस्था यांसारखी मूलभूत कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असून भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन या मार्गाचे आधुनिकीकरण केले जात आहे.सिंहस्थ काळातील वाहतूक आणि भाविक व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या या मार्गाचे उन्नतीकरण करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या ओएफसी नेटवर्कचे काम पूर्णत्वास गेले असून डिजिटल पायाभूत सुविधा अधिक सक्षम झाल्या आहेत. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेजची व्यापक कामे सुरू आहेत. भविष्यात वारंवार रस्ते खोदण्याची आवश्यकता कमी करण्यासाठी विविध युटिलिटी कामांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पंचवटी परिसरातील दीर्घकालीन वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधांना चालना मिळणार आहे.सिव्हरेज (PPP-HAM) अंतर्गत ३० मीटर क्षेत्रात काम सुरू आहे. महानगरपालिकेच्या ओएफसी नेटवर्कचे ३,९१५ मीटरचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे ८,८६० मीटर क्षेत्रातील काम सध्या प्रगतीपथावर आहे.



वाहतूक वळविण्याची योजना


आरटीओ जंक्शन ते मेहेरधाम मार्गावरील एक बाजू बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कालवा रोड जंक्शन ते तारवाला मार्केट मार्गावरील एक बाजू बंद असून उर्वरित बाजूवर दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.नकाशानुसार लाल रंग बंद मार्ग दर्शवितो, हिरवा रंग वाहतुकीसाठी खुला मार्ग दर्शवितो, तर निळा रंग पर्यायी मार्ग (डायव्हर्शन) दर्शवितो.



“सिंहस्थासाठी होत असलेली तयारी ही केवळ एका धार्मिक सोहळ्यापुरती मर्यादित नाही. या माध्यमातून शहराच्या पुढील अनेक दशकांच्या गरजांचा विचार करून पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. पेठ रोडवरील कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची क्षमता वाढेल, पावसाळ्यातील अडचणी कमी होतील आणि नागरिकांसह भाविकांनाही अधिक सुरक्षित व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल. प्रत्येक विकासकामात गुणवत्ता, समन्वय आणि दीर्घकालीन परिणामकारकता यांना प्राधान्य दिले जात आहे.”


मनीषा खत्री ,आयुक्त नाशिक महानगरपालिका

Comments
Add Comment

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी