Nashik Crime : मोबाईलचे आमिष, दोन लाखांत सौदा! नाशिकमधील अल्पवयीन मुलीच्या विक्रीचा धक्कादायक पर्दाफाश

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. हरसूल पोलिस ठाण्याच्या (Harsul Police Station) हद्दीतील एका १६ वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार याठिकाणी उघड झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत १० संशयितांना अटक केली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


हरसूल परिसरातील आदिवासी गावातील अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. मुलीला आई नव्हती. आपली मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. पण मुलगी काही सापडली नाही. अखेर हरसूल पोलिस ठाण्यात (Harsul Police Station) मुलीच्या वडलांनी धाव घेत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान परिसरातील कोणताही तरुण बेपत्ता नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आणि एक मोठे रॅकेट समोर आले.



मोबाईलचे आमिष, दोन लाखांत सौदा


तपासात उघड झाले की, आरोपींनी मोबाईल फोनचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेले. त्यानंतर तिला संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर (Kauthe Malkapur) येथे नेऊन अल्पवयीन असतानाच जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला. कौठे मलकापूर गावात तुषार पाटीलबा पचपिंड (वय २९) या तरुणाशी तिचा लावून दिला.


धक्कादायक बाब म्हणजे या मुलीसाठी दोन लाख रुपयांचा सौदा करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. काही रक्कम रोख, तर काही ‘फोन पे’द्वारे व्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात काही आरोपींनी मुलीला पळवून नेणे, काहींनी दलाली करणे, तर काहींनी तिला लपवून ठेवण्याचे काम केल्याचे तपासात उघड झाले आहे.



१० संशयित जेरबंद


संशयितांमध्ये तुषार पाटीलबा पचपिंड (वय २९), संदीप पचपिंड (४०), विशाल परचंडे (३३), महादेव साहेबराव नाईकवाडे (चौघे रा. कौठे मलकापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), सुरेश नवसू फसाळे (४६), कमल सुरेश फसाळे (३५), धर्मा नवसू फसाळे (४०, तिघे रा. गंगाम्हाळुंगी, ता. जि. नाशिक), सीता पुंडलिक बेंडकोळी (३८, रा. वेळे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), ठकूबाई लक्ष्मण माळेकर (६०, रा. सारस्ते, ता. पेठ, जि. नाशिक), सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे (४५, रा. सहाणे मळा, मु. पो. वरवंडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.


पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कारवाई करत संपूर्ण टोळीला जेरबंद केले आहे. दरम्यान, या टोळीमार्फत आणखी किती मुलींची विक्री झाली आहे का? याचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आदिवासी भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि

BMC News : मुंबईकरांना जागतिक दर्जाची, सुलभ आणि उत्तरदायी आरोग्यसेवा

- मुंबई महानगरपालिका बनवत आहे टप्पेनिहाय आराखडा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील नागरिकांना दर्जेदार,

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Ayodhya : धार्मिक व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन

नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंदिराच्या

Srinagar : अनंतनागमध्ये पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला; जखमी हेड कॉन्स्टेबल हुतात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हेड

Kalyan Banerjee : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी लोकसभेतून निलंबित

नवी दिल्ली : लोकसभेने तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित