Nashik Crime : मोबाईलचे आमिष, दोन लाखांत सौदा! नाशिकमधील अल्पवयीन मुलीच्या विक्रीचा धक्कादायक पर्दाफाश

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. हरसूल पोलिस ठाण्याच्या (Harsul Police Station) हद्दीतील एका १६ वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार याठिकाणी उघड झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत १० संशयितांना अटक केली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


हरसूल परिसरातील आदिवासी गावातील अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. मुलीला आई नव्हती. आपली मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. पण मुलगी काही सापडली नाही. अखेर हरसूल पोलिस ठाण्यात (Harsul Police Station) मुलीच्या वडलांनी धाव घेत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान परिसरातील कोणताही तरुण बेपत्ता नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याचा पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आणि एक मोठे रॅकेट समोर आले.



मोबाईलचे आमिष, दोन लाखांत सौदा


तपासात उघड झाले की, आरोपींनी मोबाईल फोनचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेले. त्यानंतर तिला संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर (Kauthe Malkapur) येथे नेऊन अल्पवयीन असतानाच जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला. कौठे मलकापूर गावात तुषार पाटीलबा पचपिंड (वय २९) या तरुणाशी तिचा लावून दिला.


धक्कादायक बाब म्हणजे या मुलीसाठी दोन लाख रुपयांचा सौदा करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. काही रक्कम रोख, तर काही ‘फोन पे’द्वारे व्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात काही आरोपींनी मुलीला पळवून नेणे, काहींनी दलाली करणे, तर काहींनी तिला लपवून ठेवण्याचे काम केल्याचे तपासात उघड झाले आहे.



१० संशयित जेरबंद


संशयितांमध्ये तुषार पाटीलबा पचपिंड (वय २९), संदीप पचपिंड (४०), विशाल परचंडे (३३), महादेव साहेबराव नाईकवाडे (चौघे रा. कौठे मलकापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), सुरेश नवसू फसाळे (४६), कमल सुरेश फसाळे (३५), धर्मा नवसू फसाळे (४०, तिघे रा. गंगाम्हाळुंगी, ता. जि. नाशिक), सीता पुंडलिक बेंडकोळी (३८, रा. वेळे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), ठकूबाई लक्ष्मण माळेकर (६०, रा. सारस्ते, ता. पेठ, जि. नाशिक), सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे (४५, रा. सहाणे मळा, मु. पो. वरवंडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.


पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कारवाई करत संपूर्ण टोळीला जेरबंद केले आहे. दरम्यान, या टोळीमार्फत आणखी किती मुलींची विक्री झाली आहे का? याचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आदिवासी भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Jack Crawley : इंग्लंडच्या स्टार फलंदाजाचा मोठा निर्णय ! कसोटी संघातून वगळल्यानंतर रेड-बॉल क्रिकेटमधून घेतला ब्रेक; आता फक्त टी-२० कडे लक्ष्य

लंडन : इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली याने आपल्या क्रिकेट करियरातील सर्वात मोठा निर्णय घेतला. गेल्या काही

Satana : कपडे वाळत टाकताना भयानक घडलं, आईचा मृत्यू तर १० वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला

Satana : सटाणा शहरातील अहिल्यादेवी चौक परिसरातील आसरा माता मंदिरासमोरील अहिल्यानगर भागात गुरुवारी एक अत्यंत

Mumbai unauthorized schools : दक्षिण मुंबईतील शाळा अनधिकृत; शिक्षण निरीक्षकांकडून टाळे ठोकण्याचे आदेश

MUMBAI : दक्षिण मुंबईतील नामांकित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि त्यांमधील काही

Global Chess League 2026 : भारतात पुन्हा रंगणार बुद्धिबळाचा थरार; बेंगळुरूमध्ये होणार चौथा हंगाम; तीन स्पेंटबरपासून ग्लोबल चेस स्पर्धेला सुरुवात

मुंबई : जागतिक बुद्धिबळविश्वासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ग्लोबल चेस लीग (GCL) 2026 चा चौथा हंगाम भारतातच आयोजित

Maharashtra Government : राज्यातील सर्व ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद

 राज्य सरकारचा निर्णय; कैद्यांची जिल्हा कारागृहात रवानगी होणार मुंबई : महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली असलेली

Pratap Sarnaik : प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे भावनिक आवाहन मुंबई, दि. १२ जून : "एसटी ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून लाखो गोरगरीब,