महापालिका आयुक्त भिडे यांनी विहिरींची स्वच्छता करण्याचे निर्देश
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी साठ्यात घट झाली आहे . हवामान खात्यानेही यंदा पाऊस उशिरा दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व विहिरींची तातडीने पाहणी करून त्यांची सद्यस्थिती तपासावी. विहिरींमधील गाळ व कचरा काढून त्यांची स्वच्छता करावी. पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची व्यवस्था उभारावी. स्थानिक नगरसेवकांच्या सहभागातून विहिरींच्या परिसरातील गृहनिर्माण संस्थांशी समन्वय साधून या विहिरींतील पाण्याचा वापर करण्यास त्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.
महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले स्पष्ट निर्देश मुंबई: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल ...
मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक गुरुवारी ११ जून २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी श्रीमती भिडे बोलत होत्या. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, सह पोलिस आयुक्त (वाहतूक) सत्य नारायण चौधरी, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीदेखील या बैठकीस उपस्थिती होती.
मुंबई : भारत अ संघाचा कर्णधार ऋतुरााज गायकवाड सध्या श्रीलंकेत चालू ट्राई सिरीज मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. अफगाणिस्तान अ विरुद्धच्या ...
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, मुंबईतील जलसाठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पर्यायी स्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या आणि हवामानातील बदलांमुळे पाणी व्यवस्थापन आव्हानात्मक बनले आहे. मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय आणि खासगी विहिरी तसेच कूपनलिकांची अद्ययावत माहिती सर्व प्रशासकीय विभागांंच्या (वॉर्ड) सहायक आयुक्तांनी संकलित करावी. विहिरींची दुरुस्ती करताना त्या वापरात येतील याची खात्री करावी. खासगी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेऊन या पाण्याचा वापर करावा. यासाठी स्थानिक नगरसेवक, प्रशासन आणि गृहनिर्माण संस्था यांनी समन्वय साधावा, असेदेखील भिडे यांनी नमूद केले.