Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केंद्र सरकारने (Central Government) अधिकृत अधिसूचनेद्वारे केली आहे. या निर्णयामुळे भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेला चालना मिळण्याबरोबरच परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



सरकारने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 22 ते 30 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे E-22, E-25, E-27 आणि E-30 या श्रेणीतील पेट्रोलवर तेल कंपन्यांना कोणतेही उत्पादन शुल्क भरावे लागणार नाही.


जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी चढ-उतार सुरू आहेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.



करमाफीमुळे तेल कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होण्याची शक्यता असून त्याचा फायदा भविष्यात ग्राहकांनाही मिळू शकतो. केंद्र सरकारने यापूर्वीच 20 टक्के इथेनॉल मिश्रित E-20 पेट्रोलला मान्यता दिली आहे आणि देशातील अनेक पेट्रोल पंपांवर ते उपलब्ध आहे. आता E-22 ते E-30 या उच्च इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोललाही करसवलतीचा लाभ मिळणार आहे.


सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉल उद्योगाला चालना मिळेल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होईल आणि देशाच्या इंधन आयात खर्चातही घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी

PM Modi - Meloni : ‘मोदींचा ऐतिहासिक महाविक्रम!’ थेट इटलीवरून आल्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. सलग सर्वाधिक

POK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचा भडका; भीषण हिंसाचार, आंदोलने आणि नेमकी परिस्थिती काय?

Mumbai : पाकव्याप्त काश्मीर (PoK) सध्या एका भीषण अशांततेच्या काळातून जात आहे. रावळकोटसह अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये

मोदी युगाचा नवा अध्याय; नरेंद्र मोदी ठरले भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 10 जून रोजी सलग

Uri Blast : ‘उरीमधील भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद; गस्तीदरम्यान नियंत्रण रेषेजवळ घडली दुर्दैवी घटना

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन

PM Narendra Modi 'X' Post : 'जनसेवा हाच खरा धर्म'!; ऐतिहासिक विक्रमानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट चर्चेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.