Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केंद्र सरकारने (Central Government) अधिकृत अधिसूचनेद्वारे केली आहे. या निर्णयामुळे भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेला चालना मिळण्याबरोबरच परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



सरकारने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 22 ते 30 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे E-22, E-25, E-27 आणि E-30 या श्रेणीतील पेट्रोलवर तेल कंपन्यांना कोणतेही उत्पादन शुल्क भरावे लागणार नाही.


जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी चढ-उतार सुरू आहेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.



करमाफीमुळे तेल कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होण्याची शक्यता असून त्याचा फायदा भविष्यात ग्राहकांनाही मिळू शकतो. केंद्र सरकारने यापूर्वीच 20 टक्के इथेनॉल मिश्रित E-20 पेट्रोलला मान्यता दिली आहे आणि देशातील अनेक पेट्रोल पंपांवर ते उपलब्ध आहे. आता E-22 ते E-30 या उच्च इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोललाही करसवलतीचा लाभ मिळणार आहे.


सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉल उद्योगाला चालना मिळेल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होईल आणि देशाच्या इंधन आयात खर्चातही घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या