Boat Accidents Maharashtra : गोंदियात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने २ तरुणांचा बुडून मृत्यू

गोंदिया : महाराष्ट्रात बीड, खेड आणि गोंदिया येथे पाण्यात बुडाल्याने सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील बोदल जलाशयातील दुर्घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. फिरायला गेलेल्या नऊ मित्रांच्या गटातील दोन तरुणांचा बोट उलटल्याने बुडून (Drowned) मृत्यू झाला, तर सात जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले.


मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा गावातील ९ युवक संध्याकाळी बोदल जलाशय परिसरात फिरण्यासाठी आले होते. तलावाजवळ फोटो (Photo) काढल्यानंतर त्यांनी मच्छीमारांच्या बोटीतून नौकाविहार (Boat Ride) करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जलाशयाच्या मध्यभागी पोहोचताच अचानक बोट (Boat) पलटी झाली आणि सर्वजण पाण्यात पडले.



अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी युवकांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकताच स्थानिक मच्छीमारांनी तातडीने बचावकार्य (Rescue Operation) हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोडे (रा. बरबसपुरा) या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मृतदेह बाहेर काढून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.



दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगावजवळील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट बुडाल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला. नदी पार करण्यासाठी निघालेली बोट अचानक बुडाल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत प्रमिला शेषराव राठोड (रा. लोणार) यांचा मृत्यू झाला, तर कांताबाई ज्ञानदेव आंधळे (रा. सिंदखेडराजा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय एका अज्ञात महिला भाविकेचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुबाई अर्जुन मावळे (रा. महागाव) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील या सलग जलदुर्घटनांमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण