BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ;


महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ


अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही- महापौर


मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे कार्यालय आणि त्यांचे वाहन बॉम्बने उडवून देण्याची धमकी खलिस्तानवादी संघटनेकडून मंगळवारी सकाळी मेलद्वारे तीन अतिरिक्त आयुक्तांना पाठविण्यात आल्यानंतर महापालिका मुख्यालयात खळबळ उडाली. प्रशासनाने, तत्काळ हालचाल करीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक पथकाने महापालिका मुख्यालयात कसून तपासणी केली. तसेच, पालिका मुख्यालयात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्यांच्याकडील सामानाची कडक तपासणी करण्यात आली.मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. अशा या मुंबई शहराचा कारभार ज्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातून हाकला जातो, त्या ठिकाणी मुंबई शहराच्या महापौर यांचे कार्यालय आहे. महापौर रितू तावडे यांनी महापौर होण्यापूर्वीच मुंबईतील घुसखोर बांग्लादेशी, रोहिंगे यांच्या विरोधात कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यांनी महापौर झाल्यानंतर प्रत्यक्ष फेरीवाले बांग्लादेशी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली.



त्याचप्रमाणे, वांद्रे रेल्वे स्थानकाच्या नजीक असलेल्या अनधिकृत झोपड्यांवरही महापालिकेने काही दिवसांपूर्वीच कारवाई केली होती. महापौरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, अविनाश ढाकणे आणि अभिजीत बांगर यांना खलिस्तानवादी संघटनेकडून एक इमेल पाठविण्यात आला. त्यामध्ये मुंबईच्या महापौरांचे कार्यालय आणि त्यांचे वाहन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने पालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली.त्यानंतर महापौर कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली. महापालिका मुख्यालयाच्या सातही प्रवेशद्वाराच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करून येणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात आली.तसेच तत्काळ डॉग स्कॉडद्वारे पालिका मुख्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. तसेच, पालिका सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. महापालिका मुख्यालयात कसून तपासणी केली. तसेच, पालिका मुख्यालयात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्यांच्याकडील सामानाची कडक तपासणी करण्यात आली.



अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही- महापौर


मंगळवारी १० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वीस (९:२०) च्या सुमारास मला धमकी देणारा एक ईमेल आला. या संदर्भात महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने मला तत्काळ सूचना दिल्या असे महापौर रितू तावडे यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. व्यक्तिशः मी अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही बांगलादेशी फेरीवाले आणि इतर अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा आणि मला डगमगवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही. राज्याच्या गृह खात्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ते या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून योग्य ती कडक कारवाई निश्चित करतील. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आपले काम करत आहे आणि मी माझे जनसेवेचे व्रत सुरूच ठेवेन. अशा धमक्यांमुळे मुंबईच्या विकासाचा आणि सुरक्षेचा वेग मंदावणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.