Mrunaltai Gore flyover : मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची गुणवत्ता योग्यच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान विस्तारित टप्प्याची बांधकाम गुणवत्ता चांगली असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवेळी आढळून येत आहे. तरीही , काही ठिकाणी आढळणारे लहान उंचवटे काढून टाकावेत, रस्त्याच्या कडा योग्य कराव्यात आणि इतर काही किरकोळ कामे (फिनिशिंग टचेस) असल्यास ती पूर्ण करावीत. तसेच, उड्डाणपुलाच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव येईल, अशा रीतीने व्हर्टिकल गार्डन किंवा अन्य योग्य पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.



महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मंगळवारी ९ जून २०२६ रोजी सायंकाळी गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले.


स्थानिक नगरसेवक संदीप पटेल, नगरसेविका प्रीती सातम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) उमेश बोडके यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


महापौर तावडे यांनी मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्यावर सर्व संबंधितांसह प्रत्यक्ष फिरून पाहणी केली. ठिकठिकाणी बांधकाम, भौमितिक रचना, वक्राकार वळण आणि त्या संदर्भात करावी लागणारी अभियांत्रिकी प्रक्रिया, बांधकाम सांधे याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी अभियंत्यांकडून जाणून घेतली.



संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलावरील वाहन मार्गावर ४० मिलिमीटर जाडीचा मास्टिक अस्फाल्ट हा वेअरिंग कोर्स म्हणजे पृष्ठभाग प्रदान करण्यात आला आहे. वाहतूक सुरू करण्यापूर्वी ओबडधोबड आणि असमान वाटणारा हा पृष्ठभाग प्रत्यक्षात रस्त्याचा वापर जसा जसा होत जातो, तसा तसा अधिक समतल होत जातो आणि दृश्य स्वरूपात हा ओबडधोबडपणा कमी होतो. नव्याने बांधलेल्या रस्त्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि जलरोधक गुणधर्म, दीर्घकालीन टिकाऊपणा तसेच गंजविरोधीक्षमता व दीर्घ सेवा आयुष्य यामुळे या तंत्रज्ञानाचा पुलांवर उपयोग केला जातो, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.



सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पाहणीअंती या उड्डाणपुलाची गुणवत्ता चांगली असल्याचे जाणवते आहे. तरीही लहान लहान आढळलेले ओबडधोबड भाग / उंचवटे काढून टाकणे, रस्त्याच्या कडा योग्य करणे, अधिकचे दिशादर्शक फलक लावणे, रस्त्याच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव यावा यासाठी व्हर्टिकल गार्डन किंवा योग्य तो पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करणे, इत्यादी कामे पूर्ण करावीत. अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कालावधी लोटल्यानंतर संपूर्ण पुलावर समतल रस्त्याचा अनुभव येईल, असे महापौरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ