कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ ...
एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक असलेले संपूर्ण जमीन संपादन पूर्ण झाले असून वन विभागासह विविध शासकीय यंत्रणांकडून आवश्यक मंजुरीही प्राप्त झाल्या आहेत. प्रकल्पातील बहुतांश नागरी कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.या कॉरिडॉरमध्ये ९ मोठे पूल, ३५ लहान पूल, १६ अंडरब्रिज, ५ उड्डाणपूल आणि ३ बोगदे उभारण्यात आले आहेत. तसेच कर्जत रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून पनवेल रेल्वे उड्डाणपूल अंतिम टप्प्यात आहे. मोहपे आणि किरावली येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई: मानखुर्द येथील राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा पॉवरच्या ताब्यातील जमिनींवरील अतिक्रमणे ...
ट्रॅक जोडणी आणि सिग्नलिंगची कामे अंतिम टप्प्यात
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मार्गावरील ट्रॅक जोडणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सिग्नलिंग आणि दूरसंचार यंत्रणांची उभारणीही वेगाने सुरू असून मोहपे आणि चौक स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या ‘फॅक्टरी ॲक्सेप्टन्स टेस्ट’ यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्य सरकार आणि अमेरिकेच्या 'क्लीव्हलँड क्लिनिक'मध्ये सामंजस्य करार मुंबई : महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात तब्बल ...
प्रवाशांना मिळणार थेट आणि पर्यायी रेल्वे मार्ग
हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पनवेल आणि कर्जतदरम्यान स्वतंत्र उपनगरी रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कल्याण जंक्शनमार्गे वळसा घालण्याची गरज भासणार नाही. प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच रेल्वेची वहनक्षमता वाढेल आणि उपनगरी रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत होईल.
MUMBAI : राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे फ्री-होल्ड (मुक्तहस्त) करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘विशेष अभय ...
निवासी आणि औद्योगिक विकासाला गती
नवी मुंबई, कर्जत आणि परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या निवासी तसेच औद्योगिक प्रकल्पांसाठी हा रेल्वे मार्ग मोठा आधार ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना पूरक ठरत हा कॉरिडॉर प्रादेशिक संपर्क अधिक मजबूत करण्याची महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असून, मुंबई महानगर प्रदेशाच्या वाहतूक व्यवस्थेत हा प्रकल्प नवी क्रांती घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.