MLA Shivaji Patil : शक्तीपीठ महामार्गाला नाहक विरोध करण्याऐवजी सहकार्य करा

चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांचे आवाहन


Mumbai : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांनी जनतेची नाहक दिशाभूल करून त्यांची माथी भडकवत यात पक्षीय राजकारण आणू नये तर या भागाचा परिपूर्ण विकास होण्यासाठी चर्चा करून सहमतीने मार्ग काढण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते.




या महामार्गाच्या कामात साठ हजार कोटींचा भ्रष्टाचार होईल, असा बिनबुडाचा आरोप करीत जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम सध्या केले जात आहे. पण 16 धनगरवाड्या असलेल्या या भागाचा विकास करायचा असेल तर महामार्ग हाच पर्याय आहे. या अविकसित भागांचाही सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे. रोजगारासाठी या भागातील तरुण-तरुणींना नाईलाजाने बाहेरच्या भागात जावे लागते. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा प्रकल्प साकार झाल्याने हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.



या महामार्गामुळे महापूर येईल, शेतीचे नुकसान होईल, अशाही वावड्या उठवण्यात येत आहेत. पण असे प्रश्न लक्षात घेऊनच या प्रकल्पाची तंत्रशुद्ध आखणी सरकारकडून केली जात आहे. यापूर्वीही इतर महामार्ग उभारताना अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. पण ती व्यर्थ ठरली आणि त्या त्या भागांचा विकास झाला हे आपण अनुभवले आहे. यापूर्वीच्या सरकारने स्थानिकांचे प्रश्न सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आता राज्य सरकार पुढाकार घेत असे महत्वाकांक्षी प्रकल्प उभारत असताना शेतकऱ्यांसह स्थानिकांनी त्यास सहकार्य करत पाठींबा देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आ. पाटील यांनी व्यक्त केलीया प्रकल्पासाठी राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेत आहे. शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर आपण बांधावर जाऊ, घराघरात जाऊ आणि त्यावर मार्ग काढू. पण प्रकल्पच रद्द करावा ही भूमिका अतिशय चुकीची आणि स्थानिकांचे नुकसान करणारी आहे. महामार्गाविरोधात निघालेल्या मोर्चामध्ये शेतकरी कमी आणि राजकारणी जास्त होते. मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना विरोधकांनी भान ठेऊन बोलावे, असे आ. पाटील यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

नवी दिल्ली : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असून अनेक कंपन्या

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड