सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; मंडळांच्या मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिव स्तरावर बैठक घेणार
मुंबई : कोकणच्या समृद्ध संस्कृतीचे आणि लोकजीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या पारंपरिक दशावतार लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, या कलेला आणि कलाकारांना सर्वतोपरी राजाश्रय दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बुधावरी दिली. दशावतार नाट्यमंडळांच्या विविध मागण्या शासनस्तरावरील वेगवेगळ्या विभागांशी संबंधित असल्याने, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर विशेष समन्वय बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
MUMBAI : राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे फ्री-होल्ड (मुक्तहस्त) करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘विशेष अभय ...
कोकणच्या या वैभवशाली लोककलेच्या रक्षणासाठी आणि कलाकारांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध दशावतार मंडळांचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोकणची ही वैशिष्ट्यपूर्ण कला एका प्रांतापुरती मर्यादित न राहता ती व्यापक स्तरावर पोहोचावी, यासाठी कोकणातील दशावतार महोत्सवांची संख्या वाढवली जाईलच, पण त्याचसोबत मुंबई आणि ठाणे या महानगरांमध्येही शासनाच्या वतीने विशेष दशावतार महोत्सवांचे भव्य आयोजन करण्यात येईल, अशी माहिती शेलार यांनी दिली. ही कला नव्या पिढीपर्यंत सक्षमपणे पोहोचावी यासाठी प्रभावी प्रशिक्षण कार्यशाळा राबवताना स्थानिक संस्थांशी समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महाराष्ट्राच्या मातीतील या लोककलांची ओळख शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने राज्याच्या लोककलांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याबाबत 'बालभारती'ला तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देश मंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय, कलाकारांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी परिवहन विभागाकडे विशेष पाठपुरावा केला जाणार आहे.
MUMBAI : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून, या जागेचा विकास ...