Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार! ३० जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील नागरिकांना उकाडा (Heat) आणि वाढत्या आर्द्रतेपासून (Humidity) लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD - India Meteorological Department) महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला असून पुढील काही दिवस मेघगर्जनेसह (Thunderstorm) पाऊस (Rainfall) कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.



३० जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert)


IMD ने ९ आणि १० जून रोजी महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार या भागांमध्ये ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे (Strong Winds) वाहू शकतात. तसेच विजांच्या कडकडाटासह (Lightning) मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.



पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० ते १३ जूनदरम्यान मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात हलका ते मध्यम पाऊस (Light to Moderate Rain) सुरू राहू शकतो. सातारा आणि कोल्हापूरमध्ये मान्सून (Monsoon) अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून काही भागांत मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) होऊ शकतो.


नाशिक आणि अहमदनगरमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या सरी (Rain Showers) कोसळू शकतात.



विदर्भ आणि खान्देशात उष्णतेचा तडाखा कायम


पाऊस पडत असला तरी विदर्भ आणि खान्देशातील नागरिकांना उष्णतेपासून (Heatwave Conditions) पूर्ण दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. या भागांमध्ये तापमान (Temperature) 40 अंश सेल्सिअसच्या पुढे राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.



शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला; पेरणीची घाई टाळा


राज्यात मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) हालचाली वाढल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी खरीप पेरणी (Kharif Sowing) करण्याची घाई करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. सर्वत्र समाधानकारक आणि सलग पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.



परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (VNMKV) हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांच्या मते, सध्या मराठवाड्यातील वातावरणामुळे मान्सूनच्या प्रगतीवर काही प्रमाणात परिणाम होत आहे. मात्र 12 ते 18 जूनदरम्यान मान्सून संपूर्ण मराठवाडा व्यापण्याची शक्यता आहे.


हवामान विभागाने नागरिकांना Safety Advisory जारी केली आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरू असताना शेतात किंवा मोकळ्या मैदानात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा कच्च्या शेडमध्ये थांबू नये, कारण अशा ठिकाणी वीज पडण्याचा धोका अधिक असतो.


तसेच विद्युत उपकरणे (Electrical Appliances) प्लगमधून काढून ठेवावीत. नदी, तलाव किंवा इतर जलस्रोत (Water Bodies) परिसरात असलेल्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Crime News: भाईंदरमध्ये खळबळ! खारफुटीत सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा, तीन सख्खे भाऊ अटकेत

भाईंदर : भाईंदर (Bhayandar) पूर्व परिसरातील खारफुटीच्या जंगलात सापडलेल्या जळालेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाच्या (Deathbody)

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात; सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यातील नवले पूल (Navale bridge) परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून

Crime News : गोळ्या घाला रे गोळ्या..." म्हणत FDA अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; गुटखा माफियांचा छत्रपती संभाजीनगरात थरार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील गंगापूर परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA)

मोठी बातमी ! तळेगाव MIDC मध्ये 'मृत्यूचा गॅस'! कंपनीत CO₂ गळतीने दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Pune Breaking News : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात आज एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तळेगाव

Jalgaon Crime : अमली पदार्थांचे व्यसन, मुलीवर अत्याचार, आता प्रशासनाकडून कारवाईचा बडगा ; जळगावात काय घडतंय ?

Jalgaon Crime : जळगाव शहरात अल्पवयीन मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक

Farmer Loan : २०१७ आणि २०१९ मधील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ

मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब; अतिरिक्त १४ हजार कोटींचा भार पडणार मुंबई : २०१७ आणि २०१९ मधील कर्जमाफी