BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका मुख्यालय इमारतीची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची सूचना सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे. मंत्रालय डिजी प्रवेश यंत्रणेच्या धर्तीवर महानगरपालिका मुख्यालयामध्येदेखील अशा प्रकारची आधुनिक यंत्रणा बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की म्हटले आहे कि, मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेली महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालतो व मुंबईशी निगडीत असलेल्या समस्या मांडण्यासाठी या मुख्यालयात दररोज हजारो नागरिक, मान्यवर व्यक्ति, नगरसेवक व लोक प्रतिनिधी येत असतात.या प्रवेशद्वाराच्या सुरक्षेबाबत मी पुन्हा एकदा आपले लक्ष वेधू इच्छितो. प्रवेशद्वारावरती प्रवेश करत असताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी मंत्रालयाच्या डिजी प्रवेश यंत्रणेच्या धर्तीवर महानगरपालिका मुख्यालयामध्येदेखील अशा प्रकारची आधुनिक यंत्रणा बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले आहे..




मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर २६.११.२००८ सारखी घटना सुध्दा घडली आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रवेशद्वाराची सुरक्षा व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता

Mantri Ashish Shelar : दशावतार लोककलेला राजाश्रय मिळणार

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; मंडळांच्या मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य