BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका मुख्यालय इमारतीची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची सूचना सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे. मंत्रालय डिजी प्रवेश यंत्रणेच्या धर्तीवर महानगरपालिका मुख्यालयामध्येदेखील अशा प्रकारची आधुनिक यंत्रणा बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की म्हटले आहे कि, मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेली महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालतो व मुंबईशी निगडीत असलेल्या समस्या मांडण्यासाठी या मुख्यालयात दररोज हजारो नागरिक, मान्यवर व्यक्ति, नगरसेवक व लोक प्रतिनिधी येत असतात.या प्रवेशद्वाराच्या सुरक्षेबाबत मी पुन्हा एकदा आपले लक्ष वेधू इच्छितो. प्रवेशद्वारावरती प्रवेश करत असताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी मंत्रालयाच्या डिजी प्रवेश यंत्रणेच्या धर्तीवर महानगरपालिका मुख्यालयामध्येदेखील अशा प्रकारची आधुनिक यंत्रणा बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले आहे..




मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर २६.११.२००८ सारखी घटना सुध्दा घडली आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रवेशद्वाराची सुरक्षा व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Wardha Crime : वर्ध्यातील रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांचे जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश

MUMBAI : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात घडलेली १२ वर्षीय मुलीवरील अत्यंत अमानुष क्रूरता आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण