बीड : देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. गोदावरी नदीत भाविकांनी खचाखच भरलेली बोट अचानक पलटल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अनेक भाविक थोडक्यात बचावले असले तरी १० ते १२ वर्षांचा एक मुलगा अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे यात्रेच्या नियोजनावर आणि सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Beed Boat Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, अधिकमास यात्रेसाठी आलेले सुमारे ५० भाविक नदी पार करण्यासाठी बोटीत बसले होते. मात्र, बोटीची क्षमता कमी असतानाही त्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. नदीच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर बोटीचा तोल गेल्याने ती अचानक पलटली आणि क्षणार्धात सर्वजण पाण्यात फेकले गेले. (Beed Boat Accident)
महिलांनी सांगितला थरारक अनुभव :
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) केलेल्या एका टिप्पणीमुळे एखाद्याचे आयुष्य आणि करिअर (Career) कसे प्रभावित होऊ शकते, याचे ताजे उदाहरण गुरुग्राममध्ये समोर आले ...
नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप :
भाविकांनी बोटधारकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, यात्रेतील गर्दीचा फायदा घेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात होते. अनेक प्रवाशांकडे लाइफ जॅकेट नव्हते. बोटींवर कोणतीही सुरक्षा तपासणी होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. "प्रवाशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी कोणीही नव्हते. बोट भरल्यावरही आणखी लोकांना बसवण्यात आले. आम्ही विरोध केला, पण आमचे कोणी ऐकले नाही," अशी प्रतिक्रिया काही भाविकांनी दिली. (Beed Boat Accident)
मोठी दुर्घटना टळली, पण धोक्याची घंटा :
सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, नदीत पडलेल्या अनेक भाविकांना स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जर पाण्याचा प्रवाह अधिक वेगवान असता किंवा बचावकार्य उशिरा सुरू झाले असते, तर परिस्थिती आणखी गंभीर बनली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (Beed Boat Accident)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) चांदिवली (Chandiwali) येथे नव्याने अग्निशमन केंद्र (Fire station) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात आगीसारख्या घटना घडल्यास आग ...