एनडीए - २ परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यूपीएससीचे सर्व्हर डाऊन

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ आणि ‘नेवल अकॅडमी’ परीक्षा (२) २०२६ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा ९ जून रोजी शेवटचा दिवस आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून यूपीएससीचे अधिकृत सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना अर्ज भरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे.एनडीएच्या परीक्षेसाठी ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ग्रामीण भागातील तसेच देशभरातील अनेक इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. त्रस्त विद्यार्थ्यांनी यूपीएससीने अर्ज भरण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी आक्रमक मागणी केली आहे. उमेदवारांनी सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून यूपीएससीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून यूपीएससीची वेबसाईट अत्यंत संथ गतीने चालत असून वेळोवेळी सर्व्हर डाऊन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. सर्व्हर योग्य रीतीने काम करत नसल्यामुळे एका विद्यार्थ्याला संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल 1 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.


अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी यूपीएससीने दिलेला 'हेल्पलाईन डेस्क नंबर' देखील लागत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील सायबर कॅफेमध्ये तासंतास बसूनही शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे अपूर्ण राहिले आहे. संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एनडीए ही देशातील अत्यंत मानाची परीक्षा मानली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, ही परीक्षा वर्षभरातून दोन वेळा (एप्रिल आणि सप्टेंबर) घेतली जाते. भारतातून साधारण ५ ते ६ लाख विद्यार्थी प्रत्येक परीक्षेला अर्ज करतात. या वेळची राष्ट्रीय पातळीवरील लेखी परीक्षा १३ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर एकाच दिवशी घेतली जाणार आहे. आता विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यूपीएससी मुदतवाढ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू