एनडीए - २ परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यूपीएससीचे सर्व्हर डाऊन

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ आणि ‘नेवल अकॅडमी’ परीक्षा (२) २०२६ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा ९ जून रोजी शेवटचा दिवस आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून यूपीएससीचे अधिकृत सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना अर्ज भरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे.एनडीएच्या परीक्षेसाठी ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ग्रामीण भागातील तसेच देशभरातील अनेक इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. त्रस्त विद्यार्थ्यांनी यूपीएससीने अर्ज भरण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी आक्रमक मागणी केली आहे. उमेदवारांनी सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून यूपीएससीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून यूपीएससीची वेबसाईट अत्यंत संथ गतीने चालत असून वेळोवेळी सर्व्हर डाऊन होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. सर्व्हर योग्य रीतीने काम करत नसल्यामुळे एका विद्यार्थ्याला संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल 1 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.


अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी यूपीएससीने दिलेला 'हेल्पलाईन डेस्क नंबर' देखील लागत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील सायबर कॅफेमध्ये तासंतास बसूनही शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे अपूर्ण राहिले आहे. संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एनडीए ही देशातील अत्यंत मानाची परीक्षा मानली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, ही परीक्षा वर्षभरातून दोन वेळा (एप्रिल आणि सप्टेंबर) घेतली जाते. भारतातून साधारण ५ ते ६ लाख विद्यार्थी प्रत्येक परीक्षेला अर्ज करतात. या वेळची राष्ट्रीय पातळीवरील लेखी परीक्षा १३ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर एकाच दिवशी घेतली जाणार आहे. आता विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यूपीएससी मुदतवाढ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

NIA Raids : दहशतवाद्यांचे मदतनीस शोधण्यासाठी एनआयएचे १८ ठिकाणी छापे

नवी दिल्ली : दहशतवाद्यांचे मदतनीस शोधण्यासाठी एनआयएने पंजाब आणि हरियाणात एकूण अठरा ठिकाणी छापे टाकले.

Kangna Ranaut : "मी एक अभिनेत्री म्हणून..." राजकारणी बनलेल्या कंगना रनौतने व्यक्त केली मनातील खंत!

नवी दिल्ली : बॉलिवूडची 'क्वीन' (Bollywood Queen) आणि विद्यमान खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच

Visakhapatnam Steel Plant accident : "आईला जपा, मन लावून शिका..."; विशाखापट्टणम दुर्घटनेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या पित्याचा काळीज पिळवटून टाकणारा शेवटचा निरोप!

विशाखापट्टणम : कोणताही बाप आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी दिवसरात्र राबत असतो. मृत्यू समोर दिसत

Samudra Manthan Mission : ऊर्जा स्वावलंबनाकडे भारताची मोठी झेप: अंदमान समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा खजिना!

ANDAMAN : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, विशेषतः मध्य-पूर्वेतील तणावामुळे इंधन दर आणि पुरवठ्याबाबत जगभरात

Ujjawala scheme : उज्ज्वला योजनेच्या अनुदानावर मर्यादा, लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एलपीजी (LPG Gas) गॅस अनुदानाबाबत नवीन चर्चांना उधाण आले आहे. योजनेतील

Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्ष भडकला; भारताने संवादातून तोडगा काढण्याची केली मागणी

नवी दिल्ली : पश्चिम आशिया आणि खाडी प्रदेशातील तणाव वाढल्यानंतर भारताने सोमवारी पुन्हा एकदा संघर्ष तातडीने कमी