मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 कर्णधार असलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या मुंबई टी-20 लीगमध्ये आपल्या दमदार खेळीमुळे चर्चेत आहे. मात्र मैदानावरील कामगिरीपेक्षा त्याच्या सोशल मीडियावरील एका हालचालीने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगवली आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचे समोर आल्यानंतर दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Surykumar Yadav-Hardik Pandya)
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-२० मुंबई लीग २०२६ मधील सामन्यात अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने अष्टपैलू खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून ...
कॅप्टन्सीच्या वादामुळे मतभेद?
याशिवाय भारतीय संघाच्या टी-२० नेतृत्वाच्या निर्णयानंतरही दोघांच्या नात्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. Rohit Sharma याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उपकर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवची टी-२० कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. त्या निर्णयामुळे हार्दिक नाराज असल्याच्या चर्चा त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. (Surykumar Yadav-Hardik Pandya)
आयपीएल 2026 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघरचनेत महत्त्वाचे बदल करत भविष्यातील यशाचा मजबूत पाया रचण्याचा प्रयत्न केला आहे. विराट कोहलीच्या ...
अधिकृत प्रतिक्रिया अद्याप नाही :
मात्र या सर्व चर्चांदरम्यान सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या किंवा मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Surykumar Yadav-Hardik Pandya)
क्रिकेटविश्वात अनेकदा खेळाडू वैयक्तिक कारणांमुळे किंवा सोशल मीडिया व्यवस्थापनातील बदलांमुळे एकमेकांना अनफॉलो करतात. त्यामुळे केवळ इन्स्टाग्रामवरील हालचालींच्या आधारे दोघांमध्ये वाद असल्याचे निश्चितपणे सांगता येणार नाही. तरीही हार्दिक आणि सूर्यकुमार हे भारतीय क्रिकेटमधील दोन महत्त्वाचे चेहरे असल्याने त्यांच्या प्रत्येक हालचालीवर चाहत्यांचे आणि क्रिकेट तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष लागले आहे. (Surykumar Yadav-Hardik Pandya)