बेस्ट देण्यात येणाऱ्या १००० कोटीतून थकीत मालमत्ता करापोटी सुमारे ९३ कोटी रुपये कापून घेणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिकेचा (BMC) आर्थिक आधार दिला जाणार असून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी बेस्ट उपक्रमाला १ हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. बेस्टला देण्यात येणार असलेल्या १ हजार कोटींपैंकी सुमारे ९३ कोटी ७८ लाख रुपये एवढी रक्कम मालमत्ता करापोटी वजा करून घेत उर्वरीत रक्कम बेस्टला अदा करण्यात येणार आहे.



बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती आणि मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन ही मुंबई महापालिकेने सन २०२६-२७ या वर्षांसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून सानुग्रह अनुदान तसेच उपक्रमाच्या दैनंदिन कारभारासह कर्मचारी खर्च आणि प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.


गेल्या काही वर्षांतही महापालिकेकडून बेस्टला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत १२, ३१२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आर्थिक सहाय्य केले आहे. तरीही वाढता खर्च, प्रवासी उत्पन्नातील तूट आणि आर्थिक दायित्वांमुळे बेस्टची आर्थिक घडी अद्याप पूर्णपणे सावरलेली नाही.



बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या काही मालमत्तांच्या अधिग्रहणाबाबतही प्रस्तावात उल्लेख करण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने पुन्हा पुढाकार घेतला असला, तरी सातत्याने दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीनंतरही उपक्रम स्वयंपूर्ण कधी होणार, हा प्रश्न मात्र कायम आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर