Buldhana 'Fake Murder Case' : राजुर 'फेक मर्डर केस' गाजली; तपासातील हलगर्जीपणामुळे दोन PI निलंबित

बुलढाणा : राज्यभर चर्चेत असलेल्या जळगाव जामोद येथील कथित बनावट हत्याकांड (Fake Murder Case) प्रकरणात तपासातील गंभीर हलगर्जीपणा (Negligence) पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलाच महागात पडला आहे. या प्रकरणी तत्कालीन एलसीबी (LCB) पोलीस निरीक्षक (Police Inspector - PI) सुनील अंबुलकर आणि तपास अधिकारी नितीन पाटील यांचे अमरावती पोलीस आयुक्तांनी निलंबन (Suspension) केले आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुर धरण परिसरात काही दिवसांपूर्वी एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच आणि डीएनए अहवाल (DNA Report) येण्याआधीच पोलिसांनी तो मृतदेह शिवानी नावाच्या तरुणीचा असल्याचा दावा केला होता.



धक्कादायक बाब म्हणजे शिवानी प्रत्यक्षात जिवंत असतानाही तिला मृत घोषित करण्यात आले. इतकेच नव्हे, तर तिच्या कथित हत्येप्रकरणी तिचे वडील आणि भावाला अटक (Arrest) करण्यात आली. त्यांच्यावर न केलेल्या खुनाची कबुली देण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे.


दरम्यान, राजुर जंगलातील या कथित खून प्रकरणात आरोपी ठरविण्यात आलेल्या बाप-लेकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी उलटे टांगून मारहाण (Assault) केली आणि खुनाची कबुली देण्यास भाग पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे संपूर्ण तपास प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.



तपासातील गंभीर त्रुटी (Investigation Lapses) आणि हलगर्जीपणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित दोन जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.


दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक (Director General of Police - DGP) सदानंद दाते उद्या जळगाव जामोदला भेट देणार आहेत. ते बुलढाणा पोलिसांची आढावा बैठक (Review Meeting) घेणार असून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल

Juhu Chowpatty : जुहू समुद्रकिना-याची स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक

मागील एक महिन्यांपासून जेसीबी, डंपरचे कंत्राट आले होते संपुष्टात मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील पावसाळ्यात

Mumbai's water stock : मुंबईचा पाणी साठा ५० टक्के पार; सर्व धरणांमध्ये सध्या ५०.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५०

Desalinate Seawater : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी जलबोगद्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड

पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत उभारणार जलबोगदा मुंबई (सचिन धानजी) : मनोरी येथे समुद्राच्या