मुंबई - गुजरात महामार्गावर वाहतूक कोंडी ; गॅस टँकर उलटला

पालघर : मुंबई-गुजरात महामार्गावरून जात असताना गॅस टँकर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस टँकर खोल खड्ड्यात उलटला. अपघात झाला आणि टँकरमधून कार्बन डायऑक्साइड (CO2) वायूची गळती झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि रसायन तज्ज्ञ यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू केले.वायू वेगाने हवेत पसरत होता त्यामुळे महामार्गावर सुरू असलेली वाहतूक ठप्प झाली.



ही घटना आज म्हणजेच रविवारी (७ जून २०२६) सकाळी दहाच्या सुमारास झाली. याआधी काही दिवसांपूर्वी मुंबईतील गजबजलेले ठिकाण दादर या परिसरात देखील गॅस पाइपलाइनची गळती झाली होती. प्रशासनाने काही काळासाठी दादरचा एक मोठा परिसर सील केला होता. तातडीने उपाय केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.



दादर (पश्चिम) येथील गोखले रोडवरील अनुग्रह हॉटेलजवळ महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) पाइपलाइनमधून सायंकाळी सहाच्या सुमारास गळती झाली होती. मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगर गॅस लिमिटेडची पथके घटनास्थळी पोहोचली.दुरुस्तीच्या कामासाठी MGL ने बाधित परिसरातील गॅस पुरवठा तात्पुरता बंद केला. वेळेत उपाय करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

Comments
Add Comment

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी