Tajinder Singh Tiwana : प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम” सुरू

मुंबई : पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रभाग क्रमांक ४७ चे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी अत्याधुनिक २४x७ मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम सुरू केली आहे. या सेवेचे चे उद्घाटन त्यांच्या हस्ते थाटात झाले.


मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकासात नवीन विचारसरणी, युवा नेतृत्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराला चालना देण्यासाठी महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांना संधी दिली आहे. त्यांच्या या दूरदर्शी विचारातून प्रेरणा घेत प्रशासन अधिक गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नागरिककेंद्रित करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आल्याचे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले.



“आजच्या काळात केवळ पारंपरिक पद्धतींनी समस्यांचे निराकरण करणे पुरेसे नाही. आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology), रिअल-टाइम मॉनिटरिंग (Real Time Monitoring) आणि अधिक चांगल्या समन्वयाच्या माध्यमातून नागरिकांना जलद आणि प्रभावी मदत पुरवणे ही काळाची गरज आहे. समस्या कळण्यापासून ते त्यावर कारवाई होईपर्यंतचा कालावधी कमीत कमी ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले”



विशेष कंट्रोल रूमअंतर्गत प्रभाग क्रमांक ४७ मधील पाणी साचण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशा ६ ठिकाणी वाय-फाय आधारित आधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संबंधित परिसरावर थेट नजर ठेवली जाणार असून, पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे पडणे किंवा इतर आपत्कालीन घटनांवर तात्काळ कारवाई सुनिश्चित केली जाईल. यासाठी कंट्रोल रूममध्ये प्रशिक्षित आपत्कालीन कर्मचारी, आवश्यक यंत्रसामग्री आणि उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, वीज पुरवठा विभाग आणि आरोग्य विभाग यांच्याशी थेट समन्वय साधण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्वरित मदत मिळू शकेल, असे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले.



“मान्सून काळात प्रत्येक नागरिकाला संकटाच्या वेळी प्रशासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास वाटला पाहिजे. नागरिकांची सुरक्षा, सुविधा आणि विश्वास हाच आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. युवा नेतृत्व आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून आम्ही प्रभाग ४७ मधील नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत”, असे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी सांगितले.


कंट्रोल रूमद्वारे (Control Room) मान्सूनमधील समस्यांवर केवळ प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांची पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर दिला जाणार आहे. संवेदनशील ठिकाणांवर सातत्याने देखरेख ठेवून संभाव्य समस्यांचा वेळेपूर्वी अंदाज घेता येईल आणि संबंधित विभागांना त्याची माहिती दिली जाईल.


सामान्यतः महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात १० ते १८ प्रभागांचा समावेश असतो. त्यामुळे मर्यादित संसाधनांमुळे प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र आणि समर्पित आपत्कालीन यंत्रणा उभारणे कठीण ठरते. हीच गरज लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ४७ मधील नागरिकांना जलद आणि प्रभावी मदत मिळावी यासाठी तेजिंदर सिंग तिवाना यांच्या पुढाकारातून स्वतंत्र, प्रशिक्षित आणि समर्पित टीम २४x७ सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर