Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक






सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या हत्येमागील सर्वांनाच हादरवून टाकणारं सत्य समोर आले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेचा तपास करताना पोलिसांनी हा नियोजित खून असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात मृत अभियंत्याच्या जवळच्या नातेवाईकाला अटक करण्यात आले आहे. (Satara Murder)


मिळालेल्या माहितीनुसार,लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ४५) हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. सलग सुट्टी असल्याने ते ठाण्याहून कराडला घरी येत होते. शनिवारी पहाटे ते कराडमध्ये उतरून घराकडे जात असताना एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मंडले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.



घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये कारने धडक दिल्यानंतर चालकाने वाहन पुन्हा मागे घेऊन मंडले यांच्यावर आणखी वारंवार गाडी चालवल्याचे दिसून आले. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचे स्पष्ट झाले.


पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती


तपासादरम्यान पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती मिळाली. मंडले यांच्या पत्नी सुरेखा मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासानुसार, या गुन्ह्यासाठी काही व्यक्तींना पैशांचे आमिष दाखवून काम सोपवण्यात आले होते.



घटनेच्या दिवशी मंडले यांनी कराडमध्ये पोहोचल्यानंतर पत्नीला फोन करून आपल्याला घेण्यासाठी येण्यास सांगितले होते. याच माहितीच्या आधारे आरोपींना त्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्याचे तपासात समोर आले आहे.


या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार पत्नी सुरेखा मंडले आणि मेहुणा संग्राम चव्हाण यांना अटक केले. हल्ले करणारे दोन जण फरार झाल्याची माहिती आहे. हल्ला करणाऱ्या अन्य दोघांचा शोध सुरू आहे. त्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून विविध पुरावे गोळा केले जात आहेत.




















Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे