मुंबई : भारतीय टी-२० क्रिकेटमध्ये नेतृत्वबदलाची मोठी चर्चा सुरू असतानाच माजी कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवबाबत व्यक्त केलेल्या भावना चाहत्यांच्या मनाला भिडल्या आहेत. टी-२० विश्वचषक जिंकूनही सूर्यकुमार यादवच्या हातातून कर्णधारपद निघून गेले असून आता टीम इंडियाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित शर्माने सूर्यकुमारच्या संघर्षमय प्रवासाला सलाम करत त्याच्याविषयी आदर व्यक्त केला. (Rohit Sharma - Surykumar Yadav)
"त्याने कधीच हार मानली नाही" - रोहित शर्मा :
"सूर्यकुमारसाठी काहीच सहज मिळालं नाही. त्याने वयाच्या ३०व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केलं. एवढा काळ वाट पाहणं आणि तरीही हार न मानणं ही मोठी गोष्ट आहे. त्याने सातत्याने मेहनत घेतली, संघर्ष केला आणि संधी मिळताच स्वतःला सिद्ध केलं," असे रोहित म्हणाला. रोहितच्या या शब्दांनी उपस्थितांनाही भावूक केले. सोशल मीडियावरही त्याच्या या वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे.
रशियाच्या मीरा आंद्रीवाने (Mirra Andreeva) फ्रेंच ओपन २०२६ महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिने पोलंडच्या माया ख्वालिन्स्काला ६-३, ६-३ अशा सरळ सेट्समध्ये ...
विश्वविजेता कर्णधार, पण फलंदाजीतील घसरण ठरली अडचण :
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला. मात्र, कर्णधार म्हणून यशस्वी ठरतानाच त्याच्या वैयक्तिक कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. श्रीलंका मालिकेनंतर कर्णधार म्हणून खेळलेल्या ४२ डावांत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या कालावधीत त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकले नाही, तर केवळ सहा अर्धशतके नोंदवली गेली.
संघ व्यवस्थापनाने भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तरीही टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमारचे योगदान मोठे मानले जाते. ११३ सामन्यांत ३२७२ धावा करत त्याने जगातील सर्वाधिक धोकादायक टी-२० फलंदाजांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
श्रेयस अय्यरवर रोहितचा पूर्ण विश्वास :
आयर्लंड दौऱ्यापासून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी परीक्षा सुरू होणार असून भारतीय संघाच्या नव्या अध्यायाकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
मुंबई : १५ वर्षीय (15-year-old) युवा क्रिकेटपटू (Young Cricketer) वैभव सूर्यवंशी याची अखेर टीम इंडिया (Team India) मध्ये निवड झाली आहे. या निवडीनंतर वैभव आता आयर्लंड (Ireland), इंग्लंड ...
भारतीय टी-२० क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात :
एका बाजूला सूर्यकुमार यादवच्या संघर्षाची आणि योगदानाची दखल घेत रोहित शर्माने त्याला मानवंदना दिली, तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरच्या रूपाने भारतीय संघाला नवा नेता मिळाला आहे. विश्वविजेता कर्णधार पदावरून पायउतार होत असताना सूर्यासाठी रोहितने उच्चारलेला "संघर्ष" हा एकच शब्द अनेकांना भावूक करून गेला. आता भारतीय टी-२० क्रिकेटचे हे नवे पर्व किती यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




