Shreyas Iyer : श्रेयस अय्यरची टीम इंडियाच्या टी२० कर्णधारपदी निवड निश्चित? कर्णधार म्हणून समोर असतील ही ३ मोठी आव्हाने

SHREYAS IYER : भारतीय क्रिकेट संघाच्या टी२० टीमचे नेतृत्व लवकरच श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला असला, तरी आता बीसीसीआय नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. सूर्यकुमार यादवचा सध्याचा खराब फॉर्म आणि वाढते वय पाहता, बीसीसीआय आता श्रेयस अय्यरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहे.



श्रेयस अय्यरसमोर असणारी ३ प्रमुख आव्हाने


१. संघ निवडीचे संतुलन आणि वैभव सूर्यवंशीचा समावेश: आयपीएल २०२६ मध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला टीम इंडियात स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे. भारताकडे आधीच ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांसारखे अनुभवी पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, वैभवला संघात स्थान दिल्यास त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये नेमक्या कोणत्या क्रमांकावर खेळवायचे आणि कुणाला बाहेर बसवायचे, हे समीकरण जुळवणे श्रेयससाठी मोठे आव्हान असेल.


२. प्रमुख खेळाडूंचा खराब फॉर्म: भारतीय संघातील अनेक मॅच-विनर खेळाडू सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहेत. शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचे आयपीएल २०२६ मधील प्रदर्शन फारसे आश्वासक राहिले नाही. एवढेच नव्हे तर, मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव दिसून आला आहे. हे खेळाडू जर आगामी मालिकांमध्ये लयीत आले नाहीत, तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.


३. विजयाचा वारसा टिकवण्याचे दडपण: भारतीय टी२० संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. २०२३ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला टी२० मालिकेत एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. गेल्या १६ मालिकांपैकी १५ मालिका भारत जिंकला असून, एक मालिका बरोबरीत सुटली आहे. हा अजेय राहण्याचा लौकिक टिकवून ठेवण्याचे मोठे दडपण श्रेयस अय्यरवर असेल. जर हा रेकॉर्ड बिघडला, तर श्रेयसवर टीकेची झोड उठू शकते.

Comments
Add Comment

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५