Mumbai Crime : गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक

 ५ दिवसांत पावणेदोनशे धाडी, १९२ जण गजाआड; राज्यभरातील धडक मोहिमांत दोन कोटींचा मुद्देमाल जप्त


मुंबई : गुटखामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य सरकारने 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यात बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. दि. १ जून ते ५ जून २०२६ या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात १९५ ठिकाणी धडक धाडी टाकण्यात आल्या असून, तब्बल १९२ आरोपींना मुसक्या आवळून गजाआड करण्यात आले आहे. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल आणि वाहने जप्त केली आहेत.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्याच्या विविध भागांत हे धाडसत्र राबवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक मोठी कारवाई धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे करण्यात आली. ५ जून रोजी परांडा येथील एका गोदामावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तब्बल १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला असून दोन जणांना जागीच अटक केली आहे.गुटख्याच्या आंतरराज्यीय तस्करीला चाप लावण्यासाठी 'एफडीए'ने पोलिसांच्या मदतीने महामार्गांवर पाळत ठेवली होती. ४ जून रोजी समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, त्यात ६० लाख ५० हजार रुपयांचा गुटखा आढळून आला, तो वाहनासह जप्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभागातील नांदेड येथे १७ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा, तर धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे २३ लाख ५० हजार रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड अंतर्गत येणाऱ्या मोशी येथे ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा माल जप्त करून चिखली पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.



कोकणात सर्वाधिक धाडी


प्रशासनाने जाहीर केलेल्या विभागवार आकडेवारीनुसार, कोकण विभागात सर्वाधिक ७९ धाडी टाकून ७८ जणांना अटक करण्यात आली. मात्र, जप्त केलेल्या मालाच्या किमतीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागात अवघ्या ९ धाडींमध्ये १ कोटी १५ लाख ६४ हजार ५३३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय पुणे विभागात ५२ धाडींत १५ लाखाहून अधिक, तर नाशिक विभागात ३५ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. मुंबईत ३० धाडी टाकून ३० जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे