Mumbai Crime : गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक

 ५ दिवसांत पावणेदोनशे धाडी, १९२ जण गजाआड; राज्यभरातील धडक मोहिमांत दोन कोटींचा मुद्देमाल जप्त


मुंबई : गुटखामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य सरकारने 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यात बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. दि. १ जून ते ५ जून २०२६ या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात १९५ ठिकाणी धडक धाडी टाकण्यात आल्या असून, तब्बल १९२ आरोपींना मुसक्या आवळून गजाआड करण्यात आले आहे. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल आणि वाहने जप्त केली आहेत.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्याच्या विविध भागांत हे धाडसत्र राबवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक मोठी कारवाई धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे करण्यात आली. ५ जून रोजी परांडा येथील एका गोदामावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तब्बल १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला असून दोन जणांना जागीच अटक केली आहे.गुटख्याच्या आंतरराज्यीय तस्करीला चाप लावण्यासाठी 'एफडीए'ने पोलिसांच्या मदतीने महामार्गांवर पाळत ठेवली होती. ४ जून रोजी समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, त्यात ६० लाख ५० हजार रुपयांचा गुटखा आढळून आला, तो वाहनासह जप्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभागातील नांदेड येथे १७ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा, तर धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे २३ लाख ५० हजार रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड अंतर्गत येणाऱ्या मोशी येथे ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा माल जप्त करून चिखली पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.



कोकणात सर्वाधिक धाडी


प्रशासनाने जाहीर केलेल्या विभागवार आकडेवारीनुसार, कोकण विभागात सर्वाधिक ७९ धाडी टाकून ७८ जणांना अटक करण्यात आली. मात्र, जप्त केलेल्या मालाच्या किमतीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागात अवघ्या ९ धाडींमध्ये १ कोटी १५ लाख ६४ हजार ५३३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय पुणे विभागात ५२ धाडींत १५ लाखाहून अधिक, तर नाशिक विभागात ३५ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. मुंबईत ३० धाडी टाकून ३० जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

IND vs AFG : गिलचा मुल्लानपूरमध्ये विक्रमांचा पाऊस; धोनी-गांगुलीला मागे टाकत कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावत अनेक विक्रम

Raigad : १९६२ पशुवैद्यकीय हेल्पलाईन आता व्हॉट्सअ‍ॅपवर

अलिबाग : गेल्या पाच वर्षांत भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय