Mumbai Crime : गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा सर्जिकल स्ट्राईक

 ५ दिवसांत पावणेदोनशे धाडी, १९२ जण गजाआड; राज्यभरातील धडक मोहिमांत दोन कोटींचा मुद्देमाल जप्त


मुंबई : गुटखामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य सरकारने 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यात बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. दि. १ जून ते ५ जून २०२६ या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात १९५ ठिकाणी धडक धाडी टाकण्यात आल्या असून, तब्बल १९२ आरोपींना मुसक्या आवळून गजाआड करण्यात आले आहे. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल आणि वाहने जप्त केली आहेत.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्याच्या विविध भागांत हे धाडसत्र राबवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक मोठी कारवाई धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे करण्यात आली. ५ जून रोजी परांडा येथील एका गोदामावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तब्बल १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला असून दोन जणांना जागीच अटक केली आहे.गुटख्याच्या आंतरराज्यीय तस्करीला चाप लावण्यासाठी 'एफडीए'ने पोलिसांच्या मदतीने महामार्गांवर पाळत ठेवली होती. ४ जून रोजी समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, त्यात ६० लाख ५० हजार रुपयांचा गुटखा आढळून आला, तो वाहनासह जप्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभागातील नांदेड येथे १७ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा, तर धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे २३ लाख ५० हजार रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड अंतर्गत येणाऱ्या मोशी येथे ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा माल जप्त करून चिखली पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.



कोकणात सर्वाधिक धाडी


प्रशासनाने जाहीर केलेल्या विभागवार आकडेवारीनुसार, कोकण विभागात सर्वाधिक ७९ धाडी टाकून ७८ जणांना अटक करण्यात आली. मात्र, जप्त केलेल्या मालाच्या किमतीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागात अवघ्या ९ धाडींमध्ये १ कोटी १५ लाख ६४ हजार ५३३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय पुणे विभागात ५२ धाडींत १५ लाखाहून अधिक, तर नाशिक विभागात ३५ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. मुंबईत ३० धाडी टाकून ३० जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

Usha Nadkarni Emotional Story : वडिलांचा कोयत्याने हल्ला, आईने काढले घराबाहेर; पडद्यावर खडूस सासू, पण खऱ्या आयुष्यात... उषा नाडकर्णींची हादरवणारी कहाणी

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ आणि त्यात 'खडूस सासू' म्हणून घराघरांत