Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचा टप्पा अखेर पूर्ण झाला असून शनिवारी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. या विस्तारित पुलामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवासाचा कालावधी तब्बल ३० ते ४० मिनिटांच्या प्रवासाचा वेळ आता केवळ ५ ते १० मिनिटांवर येणार आहे. या विस्तारीत पुलाच्या बांधकामासाठी भाजपचे स्थानिक नगरसेवक संदीप पटेल यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत यासाठी प्रयत्न केला होता.



मृणालताई गोरे उड्‌डाणपुलाचा विस्तार कामात वालभट नदीवरील वि‌द्यमान पुलाचे पाडकाम करून पुनर्बांधणी करण्‍यात आली आहे. तसेच, विद्यमान मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तार कामाशी एकत्रीकरण, अंदाजे ४५० मीटर लांबीच्या (२+२ मार्गिका) पोहोच मार्गाचे सुधारीकरणही करण्‍यात आले आहे. विस्‍तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे. या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (गोरेगाव पूर्व) ते रिलीफ रोड तसेच अंधेरी (पश्चिम) कडे जाणाऱ्या जोड रस्‍त्‍याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे ३० ते ४० मिनिटांचा प्रवास कालावधी कमी होऊन अंदाजे ५ ते १० मिनिटांपर्यत येणार आहे.



मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यास भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्यासह स्‍थानिक आमदार विद्या ठाकूर, स्‍थानिक आमदार हारून खान, हे प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते. तसेच, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्‍थानिक नगरसेवक संदीप पटेल, जिशान मुलतानी, तसेच प्रीती सातम, वर्षा टेंबवलकर, विक्रम राजपूत, हर्ष पटेल, आदी पी दक्षिण विभागातील नगरसेवक व नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.



प्रकल्पामुळे मुंबईकरांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार असून वाचलेला वेळ कुटुंबासाठी देता येईल, असे महापौर रितू तावडे म्हणाल्या. भविष्यात कोणत्याही प्रकल्पाला मुदतवाढ किंवा खर्चवाढ मंजूर केली जाणार नाही, असेही त्या म्हणाल्या. उपमहापौर संजय घाडी यांनी पुलाच्या कामात योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे कौतुक करत पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळत असल्याचे सांगितले.



यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होऊ नये, यादृष्टीने प्रशासनाने कामांची तयारी केली आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे कोणत्याही परिस्थितीत लांबणार नाहीत, याची प्रशासनाने यापुढे काळजी घ्यावी, असे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम म्हणाले.


Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा