Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह कायम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; 'पैशांपेक्षा प्रेमाने माणसे जिंकता येतात' म्हणत सुप्रिया सुळेंना टोला


मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याबाबत राज्य सरकारचा आग्रह कायम असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. नवी मुंबई विमानतळ परिसरात अवघ्या आठ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आणि देखण्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या नामकरणावर सरकारची भूमिका अधोरेखित केली.नवी मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या विमानतळावर शिवरायांचे हे भव्य स्मारक देश-विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राचा इतिहास, पराक्रम आणि संस्कृतीची ओळख करून देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अवघ्या आठ महिन्यांत हे देखणे स्मारक उभारल्याबद्दल त्यांनी सिडको आणि अदानी एअरपोर्ट लिमिटेडचे विशेष अभिनंदन केले.



दरम्यान, "यापुढे पैशांच्या जीवावर कोणीही निवडून येऊ नये, यासाठी आगामी अधिवेशनात लोकसभेत विशेष विधेयक (बिल) मांडणार," असे विधान राष्ट्रवादी (शप) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. सुळेंच्या या विधानाचा खरपूस समाचार घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मी एवढेच म्हणेन की, माणसे पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, हे जर तुम्हाला वेळेत समजले असते, तर असे बिल मांडण्याची आवश्यकताच पडली नसती. तथापि, देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि परिवर्तन आले पाहिजे, या मताचा मी देखील आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणारे कोणतेही विधेयक केंद्र सरकार किंवा कोणी लोकप्रतिनिधी आणणार असेल, तर त्यावर सकारात्मक विचार व्हायला हवा, माझी त्याला नक्कीच हरकत नाही."




बाळ मानेंबाबत निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील


कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेणारे उमेदवार बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, "भाजपमध्ये मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, तर पक्षाध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. बाळ माने हे काही आमच्यासाठी परके नाहीत, ते मूळचे भाजपमध्येच घडलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या घरवापसी संदर्भातील अंतिम निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच घेतील. ते जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना पूर्णपणे मान्य असेल," असे फडणवीस यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

Asia Cup U-18 Hockey Ind vs Pak : भारताने पाकिस्तानला नमवत गाठली अंतिम फेरी; आशिष तानी पूर्तिचा चौकार, 5-3 ने दणदणीत विजय

Mumbai : पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 ने पराभव केला.

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली

RBI Imposes Penalty on Canara Bank : RBIचा कॅनरा बँकेला झटका! KYC नियमभंग प्रकरणी ४१.८० लाखांचा दंड

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोठा दणका