The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक भागातील नाल्यांच्या कामांची पाहणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी मिठी नदीतील गाळ सफाई कामाची बोटीतून फिरून पाहणी केली या पाहणीदरम्यान मिठी नदीत मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि गाळाचे साम्राज्य पाहायला मिळाल्याने प्रशासनाच्या नालेसफाईच्या दाव्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हा गाळ तीन फूट खोल असल्याचे त्यांनी काठी गाळात रूतवून दाखवून दिले.मिठी नदीतील या पाहणीदरम्यान यशवंत किल्लेदार यांना नदीतील अनेक भागांमध्ये पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळ्यांतून जात असल्याचे दिसून आले. नदीपात्रात ठिकठिकाणी प्लास्टिक, थर्माकोल, घरगुती कचरा आणि मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने मिठी नदीचे स्वरूप नदीपेक्षा ‘गटार गंगा’सारखे झाल्याचे चित्र दिसत होते. यामुळे मुसळधार पावसाच्या काळात मुंबईची तुंबई होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.


या पाहणीदरम्यान माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना किल्लेदार यांनी मुंबईच्या महापौर आणि पालिका प्रशासनाने नाले सफाई पाहणी करत १०४ टक्के नाले सफाईचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात मिठी नदी गाळाने भरलेली असल्याचे चित्र दाखवत हा सत्ताधाऱ्यांचा सिझनल धंदा असल्याची टीका त्यांनी केली. तसेच प्रशासनावर टीका करताना, दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नालेसफाई केली जाते, असा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता सफाई कामे कितपत प्रभावी झाली आहेत, याबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे सांगितले. मिठी नदीतील गाळ आणि कचरा पावसाळ्यातच नाही तर वर्षभर नियमित केली गेली पाहिजे असे त्यांनी सांगितले.




मिठीच्या गाळात रुतली तीन फुट काठी


सर्वच नाल्यांचा कचरा हा मिठी नदीत येतो, मिठी नदीच्या काही भागातील नाले तर अक्षरशः तुडुंब भरलेल्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळाले , हा गाळ एवढा भरला आहे की एखादी काठी आत टाकली तर तीन फुटापर्यंत ती रुतली जाते,असे किल्लेदार यांनी सांगितले.या सर्व नाल्याचा कचरा मिठी नदीतून माहीम समुद्र किनारी येतो त्यामुळे दादर ते माहीमचा समुद्र किनारा कितीही साफ केला तरी तो स्वच्छ होत नाही. स्थायी समितीत आम्हांला नाल्यानविषयी बोलू दिले गेले नाही ही खेदजनक बाब आहे प्रशासनाने प्रत्येक नाल्याच्या तोंडाजवळ कचरा नदीत येऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

 हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणणार; लोकभावना लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई :

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली

Nalasopara Murder Case : धक्कादायक! ५ महिन्यांपासून बेपत्ता गँगस्टरचा अखेर उलगडा; ड्रेनेज चेंबरमधून सापडला मानवी सांगाडा

नालासोपारा :  गेल्या ५ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कुख्यात गँगस्टर रवि बिडलान (Ravi Bidlan Murder Case) प्रकरणात मोठा

Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांसाठी वह्या, स्टेशनरी आणि गणवेश खरेदीला मान्यता

शालेय साहित्य खरेदीला विलंब, मुलांना मिळणार उशिराने मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात

Mumbai Waste Management : भायखळा ते शीव पर्यंतचा भाग लोटला जाणार कचऱ्यात

सलग दुसऱ्यांदा कचरा खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळला मुंबई : मुंबईतील कचऱ्याचे खासगीकरण करण्याच्या सर्व