Mumbai : पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 ने पराभव केला. जपानमधील काकामिगाहारा येथे झालेल्या सामन्यात भारतने अखेरच्या क्वार्टरमध्ये शानदार पुनरागमन करत विक्रमी विजय मिळवला. या विजयासह भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे.भारत तिसऱ्या क्वार्टरअखेर २-३ अशा पिछाडीवर होता. मात्र अखेरच्या 15 मिनिटांत भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत पाकिस्तानच्या डिफेएनसवर सतत दबाव निर्माण केला.या काळात भारताने तीन गोल करीत पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला.
SORE LOSERS 🤧 !!!
When Bully happens players give back pass due to sportsmanship btw meanwhile in U18 Men's Hockey Asia Cup A Paki player scored from Bully & behaved like he has scored World best goal !!#Hockey pic.twitter.com/jmLfWqTfl8
— Navin Mittal (@NavinSports) June 5, 2026
आशिष तानीचा तुफान
या सामन्यात आशिष तानी पुर्ती हा भारताच्या विजयाचा खरा शिळ्पकार ठरला. त्याने एकहाती चांगली कामगिरी करत चार गोल केले.विशेष म्हणजे त्याने निर्णायक चौथ्या क्वार्टरमध्ये हॅट्ररिक पूर्ण करत भारताचा विजय निश्चित केला. सामन्याच्या 12 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. तेव्हा आशिष तानी पुर्तीने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात धाडला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने जोरदार आक्रमण केले. 27 व्या मिनिटाला अदीलने शानदार गोल करत स्कोर 1-1 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये शाहरुख अलीने गोल करत भारताला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र पाकिस्तानने तातडीने चांगली कामगिरी करत सामन्यात पुमरागमन केले. मुहम्मद फरहान असलम आणि उजैर अहमद कुरेशी यांच्या गोलमुळे पाकिस्तानने 3-2 अशी आघाडी घेतली.
𝐈𝐍 𝐂𝐀𝐒𝐄 𝐘𝐎𝐔 𝐌𝐈𝐒𝐒𝐄𝐃 𝐈𝐓... 👀🇮🇳#HockeyIndia #IndiaKaGame #U18AsiaCup2026 @imsardarsingh8 pic.twitter.com/ibc8gO6g7y
— Hockey India (@TheHockeyIndia) June 5, 2026
अखेरच्या क्षणात भारताचा जलवा
सामन्याच्या 46 व्या मिनिटाला पाकिस्तानचा खेळाडू मुजम्मिल सईद याला ग्रीन कार्ड मिळाले आणि याचवेळी सामन्याची दिशा बदलली. भारताला सलग पेनल्टी कॉर्नर्स मिळाले आणि 49 व्या मिनिटाला आशिषने गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला.53 व्या मिनिटाला आशिषने आणखी एक गोल करत हॅट्रिक पूर्ण केली आणि भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली.सामना संपण्यास अवघी काही मिनिटे बाकी असताना त्याने आणखी एक गोल करत भारताला 5-3 अशी आघाडी मिळवत विजय मिळवून दिला. शेवटच्या मिनिटांत भारतीय संघाने पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला आणि कट्टर विरोधक पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला.या विजयासह भारताने अंतिम फेरित धडक मारली. आशिया कप विजेतेपदासाठी सहा जून २०२६ ला Kawasaki Heavy Industries Hockey Stadium येथे भारात आणि जापानमध्ये लढत होणार आहे.