Transport Minister Pratap Sarnaik : एसटीची स्थानके आणि बसेसची दर चार तासांनी स्वच्छता होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; जागतिक पर्यावरण दिनी राज्यव्यापी आधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ


मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'च्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, स्वच्छ आणि दर्जेदार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व प्रमुख बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहांची आता दर चार तासांनी अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नियमित स्वच्छता केली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे राज्यातील सर्व बसस्थानके आणि बसेस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपकरणांनी स्वच्छ करून ती प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे सरनाईक यांनी यावेळी जाहीर केले.


परळ बसस्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेसाठी आणलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याप्रसंगी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "एसटी ही केवळ एक वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात, त्यामुळे त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुरू झालेली ही मोहीम प्रवाशांना एक नवा आणि आनंददायी अनुभव देईल." ही स्वच्छता मोहीम एक दिवसापुरती मर्यादित नसून, ती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीवर आणि स्वच्छतेच्या दर्जावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित देखरेख ठेवली जाईल, यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली.


प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचे पुनर्वापरासाठी संकलन


पर्यावरण रक्षणाचा संदेश देत या स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रत्येक बसस्थानकावर गोळा होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या कचऱ्यात न टाकता त्या संकलित केल्या जाणार आहेत. हे प्लास्टिक पुनर्वापरासाठी (रिसायकलिंग) पाठविण्यात येणार असून, या प्रक्रियेतून विविध टिकाऊ व उपयुक्त वस्तू तयार करण्यात येतील, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याशिवाय प्रत्येक बसस्थानकावरील स्वच्छतेचे नियोजनबद्ध निरीक्षण केले जाईल आणि प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचना व अभिप्रायांना (फीडबॅक) प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


सर्व २५१ आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन्स


पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात ई-बसेसचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यास सुरुवात केली आहे. याच धर्तीवर राज्यातील सर्व २५१ आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे भक्कम जाळे उभारण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

Comments
Add Comment

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ