Bal Mane : पदाधिकाऱ्यांच्या पत्रासाठी देखील विनायक राऊत पैसे घेतात!

बाळ माने यांचा गंभीर आरोप; मी संघ स्वयंसेवक, कोकणहिताचा निर्णय घेणार


मुंबई : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर उबाठा गटातून हकालपट्टी झालेले माजी आमदार बाळ माने यांनी आता या गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. "कोकणात उबाठा गटाची वाट लावण्याचे काम विनायक राऊत यांनीच केले असून, ते स्वतःच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांचे पत्र देण्यासाठी देखील पैसे घेतात," असा खळबळजनक आरोप बाळ माने यांनी केला आहे. विनायक राऊत यांनी आपल्यावर केलेल्या 'गद्दार' या टीकेचा खरपूस समाचार घेताना, "पालघर लोकसभा निवडणुकीच्या वेळी 'फर्न हॉटेल'मध्ये एक मोठी डील झाली होती, त्यात तुम्ही नक्की किती पैसे खाल्ले हे आधी कोकणातील जनतेला सांगा," असे आव्हानच बाळ माने यांनी दिले आहे.



माध्यमांशी संवाद साधताना बाळ माने म्हणाले, "२०२४ च्या निवडणुकीतही विनायक राऊत यांना मला उमेदवारी द्यायची नव्हती, कारण त्यांना अन्य लोकांसोबत 'सेटिंग' करायची होती. काल ते डोमकावळ्यासारखे आले आणि माझ्यावर टीका करू लागले; पण त्यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकारच काय? मी जर काही चुकीचे केले होते, तर पक्षाने मला बोलावून वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती. मात्र, विनायक राऊत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 'भाट' झाले आहेत. कोकणात शिंदे सेनेला आव्हान देणारा सक्षम नेता उबाठा गटात त्यांना नको आहे, म्हणूनच त्यांनी माझ्या विरोधात शिंदे गटाची छुपी सुपारी घेतली आहे," असा गंभीर आरोप माने यांनी केला.




मी 'आरएसएस'चा स्वयंसेवक, फडणवीसांचा शब्द मानला


आपल्या माघारीमागचे कारण स्पष्ट करताना बाळ माने म्हणाले, "मी मूळचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे १९९० पासून अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. या निवडणुकीत मंत्री नितेश राणे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी संपर्क साधला. महाविकास आघाडीकडे केवळ ५५ मते असताना निवडणुकीत उभे राहून स्वतःचे राजकीय करिअर का संपवतोस? असा सल्ला त्यांनी मला दिला. त्यांच्या या शब्दाचा मान राखूनच मी माघार घेतली. फडणवीस यांनी मला सन्मानाने बोलावले तर मी निर्णय घेईन. आता यापुढेही मी फडणवीस यांचेच ऐकणार असून सत्ताधारी पक्षात राहून कोकणच्या हिताचे निर्णय घेणार आहे", असे माने यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

UPI : आता UPI सशुल्क होणार ? लोकसभेत सादर झालेल्या विधेयकातील तरतुदी समजून घ्या

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी लोकसभेत एक विधेयक सादर केले. या

SIR Campaign : राज्यात 'एसआयआर' मोहिमेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण म्हणजेच 'एसआयआर' मोहिमेला (SIR Campaign) १७ ऑगस्टपर्यंत

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन