RBI चा सावध पवित्रा, रेपो दर ‘जैसे थे’; पण महागाईची चिंता कायम

मुंबई : पश्चिम आशियातील संकट, वाढती महागाई आणि ‘मॉन्सून’वर ‘एल निनो’चे सावट आदी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘तटस्थ’ पतधोरणाचा अवलंब केला आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय पतधोरण विषयक समितीने रेपो दरात बदल न करता तो ५.२५ टक्के इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी रेपो दरात कोणताही बदल केला नसल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे गृहकर्ज अथवा वाहन कर्जाचा हप्ता वाढणार नसून तो स्थिर राहणार आहे.आरबीआयने २०२५ वर्षात पॉलिसी रेपो दरात एकूण १२५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा रेपो दर जैसे थे ठेवला आहे. यंदाच्या मॉन्सूनची कामगिरी ही भारताचे शेती क्षेत्र आणि महागाईचा कल या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कमी पावसाचा शेती उत्पादन आणि अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ‘पतधोरण समिती’च्या निर्णयाची माहिती देताना व्यक्त केली.




महागाई दर आरबीआयच्या लक्ष्यापेक्षा कमी असतानाही, अन्नधान्य महागाईचा पुढील कल अनिश्चित स्वरुपाचा राहील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. आरबीआयने आर्थिक वर्षातील उर्वरित कालावधीसाठी महागाईचा दर ५.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आणि ‘एल निनो’ची शक्यता आदीमुळे अनिश्चितता निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.कमी पावसाचा थेट फटका पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला बसू शकतो. परिणामी प्रमुख अन्नधान्यांची पुरवठा साखळी विस्कळीत होऊन किमतींवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सूनवर एल निनोचे सावट आहे. कमी पावसाचा शेती उत्पादनांवर परिणाम होईल, असे मल्होत्रा म्हणाले.


हवामानाशी संबंधित जोखीम चिंतेची बाब


हवामानाशी संबंधित जोखीम ही एक प्रमुख चिंतेची बाब आहे. अनुकूल पावसामुळे अन्नधान्यांच्या किमती स्थिर राहण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळण्यास मदत होऊ शकते. तर कमी पावसामुळे पुढील काही महिन्यांत महागाईची परिस्थिती अधिक गुंतागुंतीचा होऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान, आरबीआयने पश्चिम आशियातील संघर्षामुळे तेलाच्या दरात झालेली वाढ आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा संदर्भ देत, आर्थिक वर्ष २०२७ साठीचा जीडीपी वाढीचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

Comments
Add Comment

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरची ट्रकला धडक, ट्रकखाली कार चिरडली

पुणे :  पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यात बुधवारी सकाळी सुमारे 6.15 वाजता भीषण अपघात झाला. नाशिकहून पुण्याकडे

Dubai Explosion : दुबई हादरली! जेबेल अली अन् पाम जुमेराहजवळ भीषण स्फोट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात

MHADA Lottery 2026 : अखेर प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या घरांची सोडत 6 ऑगस्टला; 2,640 घरांसाठी 75 हजार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या

BMC News : मुंबईतील पदपथ अतिक्रमण मुक्तीत सहायक अभियंता, परवाना निरिक्षकांची मानसिकता कुठे?

सहायक आयुक्त कुठे कुठे डोक फोडणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरणार? अल निनोचा प्रभाव वाढणार; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून पुढील दोन महिन्यांत अल निनोचा प्रभाव अधिक तीव्र

Analog Paneer Ban : राज्यात 'ॲनालॉग पनीर'वर वर्षभर बंदी; FDAचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यात ॲनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या विक्री, साठवण आणि वापरावर पुढील एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.