तेलाच्या टाकीत उतरले आणि काही क्षणांत घडलं भयंकर; जहाजावरील मुख्य अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: मुंबईजवळ समुद्रात कार्यरत असलेल्या एका तेलवाहू जहाजावर दुर्दैवी घटना घडली असून जहाजावरील ४३ वर्षीय मुख्य अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. साफसफाईच्या कामादरम्यान तेलाच्या टाकीत कोसळल्याने हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत व्यक्तीचे नाव हर्षा गोपालन राजन असून ते मूळचे चेन्नई येथील रहिवासी होते. ते 'जग आबा' या तेलवाहू जहाजावर मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. ही घटना १ जून रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, जहाजावरील स्लोप पोर्ट विभागातील साफसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी राजन तेलाच्या टाकीत उतरले होते. त्यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते टाकीतच कोसळले. हा प्रकार लक्षात येताच जहाजावरील इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि त्यांना बाहेर काढले.



यानंतर जहाजावरील वैद्यकीय सुविधेत त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी सॅटेलाइट कम्युनिकेशनद्वारे कंपनीच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी प्राथमिक माहितीच्या आधारे राजन यांच्यात जीवनाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे सांगितले.


दरम्यान, जहाज मुंबई बंदराच्या दिशेने येत असताना याबाबत यलो गेट पोलिसांना माहिती देण्यात आली. 3 जून रोजी जहाज भाऊचा धक्का येथे पोहोचल्यानंतर राजन यांना तातडीने सर जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात कोणतीही दुखापत किंवा संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. कुटुंबीयांनीही मृत्यूबाबत कोणताही संशय व्यक्त केलेला नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Nitesh Rane :चंद्रपूर जिल्ह्यात झिंगे पालन व्यवसायाला मोठी चालना देणार

मुंबई, : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे